अ‍ॅपशहर

मुंबई संघातून नायरला डच्चू

त्रिपुराविरुद्ध येत्या २५ तारखेपासून वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या अखेरच्या साखळी रणजी सामन्यासाठी मुंबई संघातून अभिषेक नायरला वगळण्यात आले आहे.

Maharashtra Times 23 Nov 2017, 4:00 am
मुंबई : त्रिपुराविरुद्ध येत्या २५ तारखेपासून वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या अखेरच्या साखळी रणजी सामन्यासाठी मुंबई संघातून अभिषेक नायरला वगळण्यात आले आहे. यावर्षी अभिषेकने १८.५७च्या सरासरीने केवळ १३० धावा केल्या. त्याला ८ बळीही मिळाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम abhishek nair dropped for mumbais next ranji match
मुंबई संघातून नायरला डच्चू


दरम्यान, डावखुरा फिरकीपटू विजय गोहिलला संघात पुन्हा स्थान मिळाले आहे. राखीव फिरकीपटू आदित्य धुमाळ यालाही वगळण्यात आले आहे. या सामन्यात काहीही करून मुंबईला विजय मिळविणे आवश्यक असेल.

मुंबई संघ : आदित्य तरे (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), जय बिस्ता, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, आकाश पारकर, कर्ष कोठारी, धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, मिनाद मांजरेकर, विजय गोहिल, अखिल हेरवाडकर, सुफियाँ शेख.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज