सिडनी :
'ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांमध्ये पुरेशी क्षमता असून, या जोरावर कसोटी मालिकेत विराट कोहलीला निश्चितच अडचणीत आणू,' असा विश्वास ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन याने व्यक्त केला आहे.
भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या पहिल्या कसोटी क्रिकेट लढतीला ६ डिसेंबरपासून अॅडलेड येथे सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर टिम पेन म्हणाला, 'आमच्या वेगवान गोलंदाजांनी त्यांच्या पूर्ण क्षमतेने मारा केला, तर कोहलीला निश्चितच अडचणीत आणता येईल. मात्र, या मालिकेत गोलदाजांनी भावनिक होता कामा नये. भावनिक झालो तर लक्ष्य साधता करता येणार नाही. अशा वेळी आम्ही शांत राहून मारा करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्या कौशल्याचा व्यवस्थित वापर करता येईल.' चेंडू कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संस्कृतीत बराच बदल झाला आहे. अर्थात, ऑस्ट्रेलियाने मवाळ धोरण स्वीकारले असून, आपला आक्रमक बाणा गमावला आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन खेळाडूंविरुद्ध मैदानावर स्वत:हून शाब्दिक द्वंद्व रंगवणार नाही, असे कोहलीने स्पष्ट केले आहे. यावर बोलताना टिम पेन म्हणाला, 'या लढतीत आम्ही कान उघडे ठेवूनच खेळणार आहोत. गरज पडेल, तेव्हा कोहलीला शब्दाने उत्तर देऊ. अर्थात, आमच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून त्याला अडचणीत आणले, तर असे करण्याची गरजच पडणार नाही.' आमचे खेळाडू त्यांच्या नेहमीच्या शैलीतच खेळणार असून, कोहलीशी बाचाबाची करण्याची गरज पडणार नाही, असेही पेनने नमूद केले.
योग्य वेळी, योग्य क्षणी संघाला गरज असेल तेव्हा सर्वोत्तम कामगिरी करण्याची गरज असल्याचेही टिम पेनने सांगितले.
'ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांमध्ये पुरेशी क्षमता असून, या जोरावर कसोटी मालिकेत विराट कोहलीला निश्चितच अडचणीत आणू,' असा विश्वास ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन याने व्यक्त केला आहे.
भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या पहिल्या कसोटी क्रिकेट लढतीला ६ डिसेंबरपासून अॅडलेड येथे सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर टिम पेन म्हणाला, 'आमच्या वेगवान गोलंदाजांनी त्यांच्या पूर्ण क्षमतेने मारा केला, तर कोहलीला निश्चितच अडचणीत आणता येईल. मात्र, या मालिकेत गोलदाजांनी भावनिक होता कामा नये. भावनिक झालो तर लक्ष्य साधता करता येणार नाही. अशा वेळी आम्ही शांत राहून मारा करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्या कौशल्याचा व्यवस्थित वापर करता येईल.' चेंडू कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संस्कृतीत बराच बदल झाला आहे. अर्थात, ऑस्ट्रेलियाने मवाळ धोरण स्वीकारले असून, आपला आक्रमक बाणा गमावला आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन खेळाडूंविरुद्ध मैदानावर स्वत:हून शाब्दिक द्वंद्व रंगवणार नाही, असे कोहलीने स्पष्ट केले आहे. यावर बोलताना टिम पेन म्हणाला, 'या लढतीत आम्ही कान उघडे ठेवूनच खेळणार आहोत. गरज पडेल, तेव्हा कोहलीला शब्दाने उत्तर देऊ. अर्थात, आमच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून त्याला अडचणीत आणले, तर असे करण्याची गरजच पडणार नाही.' आमचे खेळाडू त्यांच्या नेहमीच्या शैलीतच खेळणार असून, कोहलीशी बाचाबाची करण्याची गरज पडणार नाही, असेही पेनने नमूद केले.
योग्य वेळी, योग्य क्षणी संघाला गरज असेल तेव्हा सर्वोत्तम कामगिरी करण्याची गरज असल्याचेही टिम पेनने सांगितले.