अ‍ॅपशहर

दक्षिण आफ्रिका संघ दडपणाखाली

दक्षिण आफ्रिका संघ दडपणाखालीमोहिंदर अमरनाथभारतीय संघाची कामगिरी आता सर्वोत्तम होत आहे, यात शंका नाही...

Maharashtra Times 20 Feb 2018, 2:00 am
मोहिंदर अमरनाथ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amarnath column
दक्षिण आफ्रिका संघ दडपणाखाली


भारतीय संघाची कामगिरी आता सर्वोत्तम होत आहे, यात शंका नाही. कसोटी मालिकेतील अखेरची कसोटी आपण जिंकली आणि तिथून आपल्या कामगिरीला नवे वळण लाभले. आपण ती मालिका हरलो हे खरे असले तरी जिंकण्याची इच्छाशक्ती आपल्या खेळाडूंमध्ये दिसत होती. जर भारताला नशिबाची साथ लाभली असती, तर कसोटी मालिकाही आपण खिशात घातली असती.

वन-डे मालिकेत मात्र आपण वर्चस्व गाजविण्याच्या इराद्यानेच खेळलो. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम संघ आपण खेळविला. वन-डे मालिकेत आपण वरचष्मा राखला असला तरी प्रश्न उरतोच की, दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा जो हेतू होता, तो कसोटी मालिका जिंकण्याचा. ते हेतू सफल झालेला नसल्यामुळे अजूनही बरेच काम शिल्लक आहे. आपण वन-डे मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी तुम्ही कसे खेळलात याला महत्त्व आहे. त्याबाबतीत आपण एकाच खेळाडूंवर सर्वाधिक अवलंबून आहोत आणि तो म्हणजे विराट कोहली. भारतासाठी हे सुचिन्ह म्हणता येईल. विराट आणि शिखर वगळता आपल्याला भारतीय फलंदाजीत फार काही सकारात्मक पाहायला मिळालेले नाही. यावरून लक्षात येते की, भारताला सक्षम अशी मधली फळी हवी आहे.

टी-२०मध्ये तुम्ही त्या दिवशी कसे खेळलात हे पाहिले जाते. सध्या तरी दक्षिण आफ्रिकेचा संघ दडपणाखाली आहे. त्यातच अब्राहम डिव्हिलियर्स या मालिकेतून बाहेर पडल्यामुळे त्यांच्यावरील दडपण आणखी वाढले आहे. प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा संघ हा संघर्ष करताना पाहायला मिळतो आहे. भारतीय फिरकी गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांपुढे पेच निर्माण झाला आहे. शिवाय, मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वरनेही त्यांची कोंडी केल्याचे रविवारी पाहायला मिळाले. भुवनेश्वरच्या गोलंदाजीत विविधता पाहायला मिळते. वेगवान आणि संथ चेंडूंचा योग्य वापर त्याने अखेरच्या षटकांत केलेला दिसतो. एकूणच टी-२० मालिकाही आपण जिंकणार हे स्पष्ट दिसते आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज