मोहिंदर अमरनाथ
न्यूझीलंड हा तुल्यबळ संघ असल्याने त्यांच्यावर त्यांच्याच मायदेशात मिळवलेल्या मालिकाविजयाचे महत्व अधिक आहे. भारतीय संघासाठी हा न्यूझीलंड दौरा अनुभव संपन्न करणारा ठरला आहे. मुळात भारतीय संघ फॉर्मात आहे. न्यूझीलंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर १-४ असे नमवणे सोपे नाही. हा संघ सहजासहजी हार मानत नाही, त्यात हे वर्ल्डकप स्पर्धेचे वर्ष आहे. या वर्षांत प्रत्येक संघ आपला दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. अशा माहोलमध्ये भारताचे न्यूझीलंडवर एवढ्या सहजतेने विजय मिळवणे नक्कीच काबिले तारीफ आहे.
वनडे मालिकेतील अखेरच्या दोन्ही लढतींमध्ये परिस्थिती प्रतिकूल होती. मात्र भारतीय संघाने चौथ्या कसोटीतील पराभवातून धडे घेत कामगिरी उंचावली. चौथ्या वनडेत भारतीय संघ ९२ धावांत गारद झाला होता. पाचव्या वनडेमध्येही भारताने आघाडीचे फलंदाज स्वस्तात गमावले होते. यावेळी मात्र भारतीय संघ संयमी खेळाने सावरला. पाचव्या वनडेत रायुडू हिरो ठरला. त्याने भारतीय संघाची हेलकावे खाणारी नौका सावरली. अनुभव काय असतो हे रायुडूने दाखवून दिले. त्याच्या खेळीमुळे भारताने बऱ्यापैकी आव्हान उभारले. पडझड सुरू असताना डाव सावरण्यासाठी संयमी खेळी करणे, ही वनडे क्रिकेटमधील सर्वात सोयीची चाल आहे.
रायुडूला सुरेख साथ लाभली ती विजय शंकर, केदार जाधव आणि हार्दिक पंड्या यांची. यांच्यातील भागीदाऱ्यांमुळे भारताच्या डावाला आकार मिळाला. मला हे पाहून १९८३च्या वर्ल्डकपमधील झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीची आठवण झाली. तेव्हादेखील आपण आघाडीच्या विकेट्स अशाच गमावल्या होत्या. आघाडीचे पाच फलंदाज परतल्यानंतर कपिल देवने डावाची सुत्रे हाती घेत भारताचा डाव उभारला होता. ज्यामुळे भारताने झिम्बाब्वेवर मात केली होती. खरेतर अशा बिकट परिस्थितीत कुणीतरी पुढाकार घेऊन डावाला आकार देणे महत्त्वाचे असते जे रायुडूने केले.
आता टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या क्रिकेटमध्ये प्रत्यक्ष लढतीत जो संघ सरस कामगिरी करेल, तो जिंकतो. इथे आपण फेव्हरिट कोण असेल, हे खात्रीने सांगू शकत नाही. भारतीय संघ अनुभवी आहे, ज्याचा फायदा त्यांनी टी-२०मध्ये होईल. त्यात भारतीय खेळाडू इतर संघांतील खेळाडूंच्या तुलनेत जास्त टी-२० लढती खेळतात. टी-२० मालिका अटीतटी होईल; कारण उभय संघ तुल्यबळ आहेत. टी-२०मध्ये एखाद्या खेळाडूने पाच ते सात षटकांत दमदार कामगिरी केली, तर संघाला फायदा होतो.
(गेमप्लान)
न्यूझीलंड हा तुल्यबळ संघ असल्याने त्यांच्यावर त्यांच्याच मायदेशात मिळवलेल्या मालिकाविजयाचे महत्व अधिक आहे. भारतीय संघासाठी हा न्यूझीलंड दौरा अनुभव संपन्न करणारा ठरला आहे. मुळात भारतीय संघ फॉर्मात आहे. न्यूझीलंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर १-४ असे नमवणे सोपे नाही. हा संघ सहजासहजी हार मानत नाही, त्यात हे वर्ल्डकप स्पर्धेचे वर्ष आहे. या वर्षांत प्रत्येक संघ आपला दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. अशा माहोलमध्ये भारताचे न्यूझीलंडवर एवढ्या सहजतेने विजय मिळवणे नक्कीच काबिले तारीफ आहे.
वनडे मालिकेतील अखेरच्या दोन्ही लढतींमध्ये परिस्थिती प्रतिकूल होती. मात्र भारतीय संघाने चौथ्या कसोटीतील पराभवातून धडे घेत कामगिरी उंचावली. चौथ्या वनडेत भारतीय संघ ९२ धावांत गारद झाला होता. पाचव्या वनडेमध्येही भारताने आघाडीचे फलंदाज स्वस्तात गमावले होते. यावेळी मात्र भारतीय संघ संयमी खेळाने सावरला. पाचव्या वनडेत रायुडू हिरो ठरला. त्याने भारतीय संघाची हेलकावे खाणारी नौका सावरली. अनुभव काय असतो हे रायुडूने दाखवून दिले. त्याच्या खेळीमुळे भारताने बऱ्यापैकी आव्हान उभारले. पडझड सुरू असताना डाव सावरण्यासाठी संयमी खेळी करणे, ही वनडे क्रिकेटमधील सर्वात सोयीची चाल आहे.
रायुडूला सुरेख साथ लाभली ती विजय शंकर, केदार जाधव आणि हार्दिक पंड्या यांची. यांच्यातील भागीदाऱ्यांमुळे भारताच्या डावाला आकार मिळाला. मला हे पाहून १९८३च्या वर्ल्डकपमधील झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीची आठवण झाली. तेव्हादेखील आपण आघाडीच्या विकेट्स अशाच गमावल्या होत्या. आघाडीचे पाच फलंदाज परतल्यानंतर कपिल देवने डावाची सुत्रे हाती घेत भारताचा डाव उभारला होता. ज्यामुळे भारताने झिम्बाब्वेवर मात केली होती. खरेतर अशा बिकट परिस्थितीत कुणीतरी पुढाकार घेऊन डावाला आकार देणे महत्त्वाचे असते जे रायुडूने केले.
आता टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या क्रिकेटमध्ये प्रत्यक्ष लढतीत जो संघ सरस कामगिरी करेल, तो जिंकतो. इथे आपण फेव्हरिट कोण असेल, हे खात्रीने सांगू शकत नाही. भारतीय संघ अनुभवी आहे, ज्याचा फायदा त्यांनी टी-२०मध्ये होईल. त्यात भारतीय खेळाडू इतर संघांतील खेळाडूंच्या तुलनेत जास्त टी-२० लढती खेळतात. टी-२० मालिका अटीतटी होईल; कारण उभय संघ तुल्यबळ आहेत. टी-२०मध्ये एखाद्या खेळाडूने पाच ते सात षटकांत दमदार कामगिरी केली, तर संघाला फायदा होतो.
(गेमप्लान)