स्पॉट फिक्सिंग: आफ्रिदीच्या थप्पडेनंतर आमीरची कबुली
इंग्लंडच्या २०१०मधील दौऱ्यामध्ये उघडकीस आलेल्या 'स्पॉट-फिक्सिंग' प्रकरण क्रिकेट जगात खळबळ उडाली होती. पाकिस्तानचा तत्कालीन कर्णधार शाहीद आफ्रिदीने थप्पड मारल्यानंतरच वेगवान गोलंदाज महंमद आमीरने या प्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिली होती
महाराष्ट्र टाइम्स 13 Jun 2019, 9:27 am
वृत्तसंस्था, कराची
इंग्लंडच्या २०१०मधील दौऱ्यामध्ये उघडकीस आलेल्या 'स्पॉट-फिक्सिंग' प्रकरण क्रिकेट जगात खळबळ उडाली होती. पाकिस्तानचा तत्कालीन कर्णधार शाहीद आफ्रिदीने थप्पड मारल्यानंतरच वेगवान गोलंदाज महंमद आमीरने या प्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिली होती. तर, सलमान बट्ट आधीपासूनच अशा गैरव्यवहारांमध्ये सहभागी होता, असा गौप्यस्फोट पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकने केला आहे.
पाकिस्तानच्या २०१०च्या इंग्लंड दौऱ्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात आयसीसीने कारवाई करत, सलमान बट्ट, महंमद आमीर आणि महंमद आसिफ या तीन खेळाडूंवर पाच वर्षांची बंदी घातली होती. या तिन्ही खेळाडूंनी बंदीनंतर पुनरागमन केले असले, तरीही त्यातील आमीरच वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानच्या संघामध्ये स्थान मिळवू शकला आहे. 'स्पॉट-फिक्सिंग' प्रकरणामुळे पाकिस्तानच्या प्रतिमेला मोठा तडा गेल्याचे सांगत रझाकने त्या दिवसाची आठवण सांगितली. तो म्हणाला, 'आफ्रिदी आणि आमीर यांच्याबरोबर मीही त्यावेळी खोलीमध्ये होतो. मात्र, आफ्रिदीने मला खोलीबाहेर जाण्यास सांगितले. मी खोलीबाहेर पडताच थप्पड मारल्याचा आवाज आला आणि आमीरने सर्व सत्य कथन केले.' पाकिस्तानची प्रतिमा खालावण्यासाठी रझाकने तत्कालीन क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनाही दोषी धरले आले. या पदाधिकाऱ्यांनी आपली कार्यक्षमता दाखविण्यासाठी आयसीसीसमोर हे प्रकरण नेले. त्याऐवजी, त्यांनी या खेळाडूंना देशात आणत, त्यांच्यावर बंदी घातली असती, तर पाकिस्तानच्या प्रतिमेला धक्का बसला नसता, असेही रझाकने नमूद केले आहे.
बट्टविषयी तो म्हणाला, 'या दौऱ्यामध्ये सलमान बट्ट जाणीवपूर्वक चेंडू निर्धाव खेळून काढत होता. मी याविषयीची चिंता आफ्रिदीकडे व्यक्त केली होती. मात्र, हा माझा गैरसमज असेल, असे आफ्रिदी म्हणाला होता. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये मी आफ्रिदीची समजूत काढली आणि बट्टला संघाबाहेर ठेवण्यास भाग पाडले होते.'
इंग्लंडच्या २०१०मधील दौऱ्यामध्ये उघडकीस आलेल्या 'स्पॉट-फिक्सिंग' प्रकरण क्रिकेट जगात खळबळ उडाली होती. पाकिस्तानचा तत्कालीन कर्णधार शाहीद आफ्रिदीने थप्पड मारल्यानंतरच वेगवान गोलंदाज महंमद आमीरने या प्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिली होती. तर, सलमान बट्ट आधीपासूनच अशा गैरव्यवहारांमध्ये सहभागी होता, असा गौप्यस्फोट पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकने केला आहे.
पाकिस्तानच्या २०१०च्या इंग्लंड दौऱ्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात आयसीसीने कारवाई करत, सलमान बट्ट, महंमद आमीर आणि महंमद आसिफ या तीन खेळाडूंवर पाच वर्षांची बंदी घातली होती. या तिन्ही खेळाडूंनी बंदीनंतर पुनरागमन केले असले, तरीही त्यातील आमीरच वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानच्या संघामध्ये स्थान मिळवू शकला आहे. 'स्पॉट-फिक्सिंग' प्रकरणामुळे पाकिस्तानच्या प्रतिमेला मोठा तडा गेल्याचे सांगत रझाकने त्या दिवसाची आठवण सांगितली. तो म्हणाला, 'आफ्रिदी आणि आमीर यांच्याबरोबर मीही त्यावेळी खोलीमध्ये होतो. मात्र, आफ्रिदीने मला खोलीबाहेर जाण्यास सांगितले. मी खोलीबाहेर पडताच थप्पड मारल्याचा आवाज आला आणि आमीरने सर्व सत्य कथन केले.' पाकिस्तानची प्रतिमा खालावण्यासाठी रझाकने तत्कालीन क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनाही दोषी धरले आले. या पदाधिकाऱ्यांनी आपली कार्यक्षमता दाखविण्यासाठी आयसीसीसमोर हे प्रकरण नेले. त्याऐवजी, त्यांनी या खेळाडूंना देशात आणत, त्यांच्यावर बंदी घातली असती, तर पाकिस्तानच्या प्रतिमेला धक्का बसला नसता, असेही रझाकने नमूद केले आहे.
बट्टविषयी तो म्हणाला, 'या दौऱ्यामध्ये सलमान बट्ट जाणीवपूर्वक चेंडू निर्धाव खेळून काढत होता. मी याविषयीची चिंता आफ्रिदीकडे व्यक्त केली होती. मात्र, हा माझा गैरसमज असेल, असे आफ्रिदी म्हणाला होता. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये मी आफ्रिदीची समजूत काढली आणि बट्टला संघाबाहेर ठेवण्यास भाग पाडले होते.'