मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची माळ जंटलमन्स गेममधील सच्चा 'जंटलमन' आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार 'जम्बो' - अर्थात अनिल कुंबळेच्या गळ्यात पडली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रमवीर फिरकीपटूंपैकी एक आणि आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये मानाचं स्थान मिळवलेला कुंबळे एका वर्षासाठी टीम इंडियाचा 'महागुरू' असेल, अशी घोषणा आज बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी केली.
अनिल कुंबळे, रवी शास्त्री की आणखी कुणी?, कोण होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक?, या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या प्रश्नाचं उत्तर अखेर आज मिळालं. आपल्या फिरकीनं भल्या-भल्यांची गिरकी घेणाऱ्या अनिल कुंबळेनं रवी शास्त्रींसह ५६ तुल्यबळ स्पर्धकांना तंबूचा रस्ता दाखवला आणि भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा मुकूट पटकावला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, 'दादा' सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीनं बीसीसीआयचे माजी चिटणीस संजय जगदाळे यांच्यासोबत २१ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन आणि प्रेझेन्टेशन पाहून बीसीसीआयला काही नावांची शिफारस केली होती. अनिल कुंबळेला त्यांची सर्वाधिक पसंती होती. तुम्हाला कोच का करावं आणि परदेशात टीम इंडियाला तुम्ही कसा विजय मिळवून द्याल, या दोन प्रश्नांची सविस्तर आणि समाधानकारक उत्तरं कुंबळेनं दिली होती.
अर्थात, गेले १८ महिने टीम इंडियाचे संचालक म्हणून काम पाहिलेले भारताचे माजी कर्णधार रवी शास्त्रीही प्रशिक्षकपदाचे दावेदार होते. परंतु, बीसीसीआयनं अनिल कुंबळेच्या नावावर शिक्का मारला.
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये १३२ सामन्यांत ६१९ विकेट्स घेण्याचा पराक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्यासोबतच, नाबाद ११० धावांच्या खेळीसह त्याने कसोटीत २,५०६ धावाही केल्यात. पाकिस्तानविरुद्ध एका कसोटी डावात सर्वच्या सर्व दहा विकेट्स घेण्याची किमया करून त्यानं आपली क्षमता दाखवून दिली होती. वनडे कारकीर्दीत, २७१ सामन्यात कुंबळेनं ३३७ विकेट्स घेतल्यात आणि ९३६ धावा केल्यात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९५६ विकेट्स घेण्याचं कामगिरी करणारा कुंबळे हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे.
अत्यंत शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या अनिल कुंबळेला पद्मश्री पुरस्कारानंही गौरवण्यात आलं आहे. आता नव्या दमाच्या टीम इंडियाला घडवण्याचं काम त्यानं चोख बजावावं, यासाठी भारतीय क्रिकेटप्रेमी त्याला 'कम ऑन जम्बो' अशाच शुभेच्छा देत आहेत.
भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची माळ जंटलमन्स गेममधील सच्चा 'जंटलमन' आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार 'जम्बो' - अर्थात अनिल कुंबळेच्या गळ्यात पडली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रमवीर फिरकीपटूंपैकी एक आणि आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये मानाचं स्थान मिळवलेला कुंबळे एका वर्षासाठी टीम इंडियाचा 'महागुरू' असेल, अशी घोषणा आज बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी केली.
अनिल कुंबळे, रवी शास्त्री की आणखी कुणी?, कोण होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक?, या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या प्रश्नाचं उत्तर अखेर आज मिळालं. आपल्या फिरकीनं भल्या-भल्यांची गिरकी घेणाऱ्या अनिल कुंबळेनं रवी शास्त्रींसह ५६ तुल्यबळ स्पर्धकांना तंबूचा रस्ता दाखवला आणि भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा मुकूट पटकावला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, 'दादा' सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीनं बीसीसीआयचे माजी चिटणीस संजय जगदाळे यांच्यासोबत २१ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन आणि प्रेझेन्टेशन पाहून बीसीसीआयला काही नावांची शिफारस केली होती. अनिल कुंबळेला त्यांची सर्वाधिक पसंती होती. तुम्हाला कोच का करावं आणि परदेशात टीम इंडियाला तुम्ही कसा विजय मिळवून द्याल, या दोन प्रश्नांची सविस्तर आणि समाधानकारक उत्तरं कुंबळेनं दिली होती.
अर्थात, गेले १८ महिने टीम इंडियाचे संचालक म्हणून काम पाहिलेले भारताचे माजी कर्णधार रवी शास्त्रीही प्रशिक्षकपदाचे दावेदार होते. परंतु, बीसीसीआयनं अनिल कुंबळेच्या नावावर शिक्का मारला.
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये १३२ सामन्यांत ६१९ विकेट्स घेण्याचा पराक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्यासोबतच, नाबाद ११० धावांच्या खेळीसह त्याने कसोटीत २,५०६ धावाही केल्यात. पाकिस्तानविरुद्ध एका कसोटी डावात सर्वच्या सर्व दहा विकेट्स घेण्याची किमया करून त्यानं आपली क्षमता दाखवून दिली होती. वनडे कारकीर्दीत, २७१ सामन्यात कुंबळेनं ३३७ विकेट्स घेतल्यात आणि ९३६ धावा केल्यात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९५६ विकेट्स घेण्याचं कामगिरी करणारा कुंबळे हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे.
अत्यंत शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या अनिल कुंबळेला पद्मश्री पुरस्कारानंही गौरवण्यात आलं आहे. आता नव्या दमाच्या टीम इंडियाला घडवण्याचं काम त्यानं चोख बजावावं, यासाठी भारतीय क्रिकेटप्रेमी त्याला 'कम ऑन जम्बो' अशाच शुभेच्छा देत आहेत.