अ‍ॅपशहर

अश्विनने टाकली गुगली

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बक्षीस स्वीकारल्यानंतर भारताचा यशस्वी ऑफस्पिनर आर. अश्विनने काही ‘गुगली’ही टाकल्या.

Maharashtra Times 10 Mar 2017, 12:13 am
बेंगळुरू : भारतीय क्रिकेट बोर्डाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बक्षीस स्वीकारल्यानंतर भारताचा यशस्वी ऑफस्पिनर आर. अश्विनने काही ‘गुगली’ही टाकल्या. फारुख इंजीनियर यांनी अश्विनला सवाल केला की, ‘कर्नाटकच्या पाण्यात नेमके काय आहे की, चंद्रा, प्रसन्ना आणि तुझ्यासारखे गोलंदाज घडले ? या प्रश्नावर मूळचा तामिळनाडूचा असलेला अश्विन म्हणाला की, यात मी राजकारण आणत नाही, पण कावेरीचे पाणी नुकतेच तामिळनाडूला मिळाले. त्याचाच यात वाटा असावा.’ अश्विनच्या या समयसूचकतेमुळे उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ashwin wins hearts covers for engineer faux pas at bcci awards
अश्विनने टाकली गुगली


अश्विन असेही म्हणाला की, मी बेदी व प्रसन्ना यांच्या बळींची संख्या पाहिली तेव्हा मला असे वाटले की, माझ्या बळींची संख्या तेवढी करण्यासाठी मला गल्लीबोळात मी काढलेल्या विकेटसचाही त्यात समावेश करावा लागेल. तरीही मी त्यांच्या संख्येपर्यंत पोहोचू शकेन असे वाटत नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज