ढाका : ऑस्ट्रेलियाने होणारी बांगलादेशविरुद्धची मालिका रद्द केली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये बांगलादेश संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार होता. या दौऱ्यात बांगलादेश दोन कसोटी आणि तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळणार होता. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आर्थिक कारण पुढे करून हा दौरा रद्द केला. याबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नाराजी व्यक्त केली आहे. बांगलादेश २००८ पासून ऑस्ट्रेलियात एकही सामना खेळलेला नाही. त्याचबरोबर शेवटचा कसोटी सामना २००३मध्ये खेळला आहे.
ऑस्ट्रेलियाने केला दौरा रद्द
ऑस्ट्रेलियाने होणारी बांगलादेशविरुद्धची मालिका रद्द केली आहे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये बांगलादेश संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार होता...
Maharashtra Times 12 May 2018, 4:00 am