अ‍ॅपशहर

टीम इंडिया मालामाल!

ऑस्ट्रेलियाला धरमशाला येथील चौथ्या कसोटीत पराभूत करून चार सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकणाऱ्या टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत असून बीसीसीआयनेही संघातील खेळाडूंना घसघशीत बक्षिस जाहीर केलं आहे.

Maharashtra Times 29 Mar 2017, 8:36 am
मटा ऑनलाइन वृत्त । धरमशाला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bcci announced cash prize for team india and its supporting staff
टीम इंडिया मालामाल!


ऑस्ट्रेलियाला धरमशाला येथील चौथ्या कसोटीत पराभूत करून चार सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकणाऱ्या टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत असून बीसीसीआयनेही संघातील खेळाडूंना घसघशीत बक्षिस जाहीर केलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची 'हाय व्होल्टेज' मालिका जिंकणाऱ्या विराटसेनेतील शिलेदारांना प्रत्येकी ५० लाख रुपये बक्षिस म्हणून देण्यात येणार आहेत. याशिवाय मुख्य कोच अनिल कुंबळेला २५ लाख तर सपोर्ट स्टाफला १५ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

भारतीय संघाने २०१६-२०१७ या मोसमात जबरदस्त कामगिरी केली. मोसमाच्या सुरुवातीलाच भारताने न्यूझीलंडला ३-० असा दणका दिला. त्यानंतर लागोपाठ चार कसोटी मालिका भारताने जिंकल्या. न्यूझीलंड, इग्लंड, बांगलादेश आणि आता ऑस्ट्रेलियाला भारताने पराभवाची धूळ चारली. या मालिकाविजयांसह भारताने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पहिलं स्थान कायम राखलं असून असून हा दुहेरी आनंद बीसीसीआयने खेळाडूंना घसघशीत बक्षिस देऊन द्विगुणित केला आहे.

आयसीसीकडून ६.५ कोटी आणि गदा

ऑस्ट्रेलियाचा मालिकेत २-१ असा पराभव करून भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीतील आपलं पहिलं स्थान आणखी भक्कम केलं आहे. आयसीसीकडून आज टीम इंडियाला पहिल्या क्रमांकाचा मान म्हणून गदा देण्यात आली तसेच १० लाख डॉलरचा धनादेश (सुमारे ६.५ कोटी रुपये) बक्षिसही दिलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज