अ‍ॅपशहर

विराटला 'मेमो'प्रकरणीबीसीसीआयने केले खंडन

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने ट्विटरवर चाहत्याला दिलेल्या प्रत्युत्तरानंतर त्याला क्रिकेट बोर्डाच्या प्रशासकांनी नम्रपणे वागण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त होते. पण बीसीसीआयने असा कोणताही संदेश विराटला प्रशासकांकडून गेलेला...

Maharashtra Times 19 Nov 2018, 12:02 am
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने ट्विटरवर चाहत्याला दिलेल्या प्रत्युत्तरानंतर त्याला क्रिकेट बोर्डाच्या प्रशासकांनी नम्रपणे वागण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त होते. पण बीसीसीआयने असा कोणताही संदेश विराटला प्रशासकांकडून गेलेला नसल्याचे म्हटले आहे आणि सदर वृत्त हे निराधार असल्याची टिप्पणीही केली आहे. प्रशासकांकडून विराटला नम्रपणे वागण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले होते. त्यावर बीसीसीआयने रविवारी खुलासा केला. विराटने एका चाहत्याला प्रत्युत्तर देताना त्याने भारतात राहू नये, अशी कडवट टीका केली होती. त्यावर प्रशासकांनी त्याला सुनावल्याचे या वृत्तात म्हटले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bcci rubbishes media reports on coas memo to virat kohli
विराटला 'मेमो'प्रकरणीबीसीसीआयने केले खंडन

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज