अ‍ॅपशहर

बंगालची मुंबईवर मात

विजय हजारे वनडे क्रिकेट स्पर्धेत बंगालने मुंबईला ९६ धावांनी पराभूत करत आपल्या सलग चौथ्या विजयाची नोंद केली. क गटात आपले स्थान बळकट करताना बंगालने मुंबईविरुद्धच्या या सामन्यात सलामीवीर अभिमन्यू इश्वरच्या शतकी खेळाच्या जोरावर २३० धावांपर्यंत झेप घेतली. त्याला उत्तर देताना मुंबईचा डाव अवघ्या १३४ धावांत आटोपला.

Maharashtra Times 4 Mar 2017, 2:00 am
चेन्नई : विजय हजारे वनडे क्रिकेट स्पर्धेत बंगालने मुंबईला ९६ धावांनी पराभूत करत आपल्या सलग चौथ्या विजयाची नोंद केली. क गटात आपले स्थान बळकट करताना बंगालने मुंबईविरुद्धच्या या सामन्यात सलामीवीर अभिमन्यू इश्वरच्या शतकी खेळाच्या जोरावर २३० धावांपर्यंत झेप घेतली. त्याला उत्तर देताना मुंबईचा डाव अवघ्या १३४ धावांत आटोपला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bengal fourth consecutive win
बंगालची मुंबईवर मात


शार्दूल ठाकूर आणि अभिषेक नायर या मुंबईच्या गोलंदाजांनी मिळून सात विकेटस घेत बंगालला हादरा दिला खरा पण इश्वरनने एक बाजू लावून धरली. मुंबईचे सलामीवीर मात्र या धावांचा सामना करताना पाच षटकातच माघारी परतले. १०० धावांपर्यंत पोहोचताना मुंबईची चांगलीच दमछाक झाली. त्यांचे सात फलंदाज तेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतले होते. बंगालचा वेगवान गोलंदाज सयान घोष व प्रज्ञान ओझा यांनी प्रत्येकी ३ बळी घेत मुंबईला लगाम घातला. मुंबईतर्फे सर्वाधिक धावा केल्या त्या श्रेयस अय्यरने (३४). त्याखालोखाल सिद्धेश लाड (२३) व आदित्य तरे (२०) यांनी धावा केल्या.

उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला रोखले

कटकः प्रशांत गुप्ता आणि शिवम चौधरीच्या शतकानंतर पियुष चावलाच्या अचूक फिरकीच्या जोरावर उत्तर प्रदेश संघाने विजय हजारे करंडक वनडे स्पर्धेतील महाराष्ट्राची विजयी घोडदौड रोखली. सलग चार विजयानंतर महाराष्ट्राला पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेश संघाने ३७० धावा केल्या. यानंतर महाराष्ट्राला ३८.५ षटकांत २६६ धावांत रोखून १०४ धावांनी शानदार विजय मिळवला.

सामन्यांचे निकाल

उत्तर प्रदेश ५० षटकांत ५ बाद ३७० (प्रशांत गुप्ता १२९, शिवम चौधरी ११६; श्रीकांत मुंढे ३-७४, जगदीश झोपे २-६५) वि. वि. महाराष्ट्र ३८.५ षटकांत २६६ (केदार जाधव ६८, ऋतुराज गायकवाड ५९, राहुल त्रिपाठी ५७, पीयूष चावला ५-५०, अंकित राजपूत २-२२, अक्षदीप नाथ २-२८).

बंगाल ४८.५ षटकांत २३० (अभिमन्यू ईश्वरन १२७; शार्दूल ठाकूर ४-४७, अभिषेक नायर ३-३५) विजयी वि. मुंबई ३६.२ षटकांत १३४ (श्रेयस अय्यर ३४, सिद्धेश लाड २३, प्रग्यान ओझा ३-२८, सायन घोष ३-४८).

हैदराबाद ५० षटकांत ८ बाद २०३ (कोला सुमंथ ४८, बी. संदीप ४३, एस. नदीम ३-२७) विजयी वि. झारखंड ४४.४ षटकांत १८२ (सौरभ तिवारी १०२, महेंद्रसिंह धोनी २८, हसन ३-४०, रवी किरण २-३८).

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज