अ‍ॅपशहर

आखूड टप्प्याची सवय

भुवनेश्वर कुमारचे मत वृत्तसंस्था, जोहान्सबर्गआखूड टप्प्याच्या चेंडूंचा सामना करण्यात आपण फारसे वाकबगार नाही, हे चित्र या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ...

PTI 20 Feb 2018, 2:00 am

वृत्तसंस्था, जोहान्सबर्ग

महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhuvneshwar kumars pace change shows south africas short ball tactics flawed
आखूड टप्प्याची सवय


आखूड टप्प्याच्या चेंडूंचा सामना करण्यात आपण फारसे वाकबगार नाही, हे चित्र या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात बदलले असे मत भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने व्यक्त केले आहे. भारतीय फलंदाजांवर आखूड टप्प्याच्या चेंडूंचा मारा करून त्यांना बिथरवण्याचे डावपेच टी-२० मालिकेत अपयशी ठरत आहेत, असे भुवनेश्वरला वाटते.

भुवनेश्वर म्हणतो की, जेव्हा आपण परदेश दौऱ्यावर जातो, तेव्हा उसळत्या चेंडूंचा सामना करण्यात आपण अपयशी ठरतो अशी ख्याती सांगितली जाते. पण यावेळी आपल्या फलंदाजांमध्ये ती त्रुटी आढळली नाही. उलट त्यांनी या उसळत्या चेंडूंचा मारा थोपवून धरला. पहिल्या टी-२० सामन्यात त्यांनी ५-६ षटके उसळणाऱ्या चेंडूंचा मारा केला पण ते डावपेच त्यांच्यावरच उलटले. गेल्या काही वर्षांत आपण हे चित्र बदलून टाकले आहे. या दौऱ्यात आपण आखूड टप्प्याच्या चेंडूचा सहज सामना केला.

भुवनेश्वरने पहिल्या टी-२० सामन्यात २४ धावांत ५ विकेटस घेतल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २० षटकांत १७५ धावापर्यंतच मजल मारता आली.

भुवनेश्वरने आपल्या गोलंदाजीबद्दल सांगितले की, मी माझ्या गोलंदाजीच्या वेगात बदल केला. कारण मला ठाऊक होते की, फटकेबाजी करणे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सहज शक्य होणार नाही. खेळपट्टीनुसार तुम्ही चेंडूंतील वैविध्य कसे राखता हे महत्त्वाचे असते. या सामन्यात मंदगती चेंडू टाकणे हा आमच्या डावपेचाचा भाग होता. प्रतिस्पर्धी फलंदाजांना धावा करण्यापासून रोखण्याची आमची योजना होती. दिशा आणि टप्पा याबरोबरीने तुम्ही चेंडूंचे वैविध्य कसे राखता येईल हे महत्त्वाचे होते.

भुवनेश्वरच्या कामगिरीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेवर २८ धावांनी विजय मिळविला.

भुवनेश्वरने सांगितले की, जेव्हा आम्ही दक्षिण आफ्रिकेत पोहोचलो तेव्हा आम्हाला ठाऊक होते की, गोलंदाजांची फळी म्हणून आम्हाला काय करायचे आहे. पहिल्या दोन कसोटीत आम्हाला हार सहन करावी लागली पण आम्ही पुनरागमन केले आहे.

भुवनेश्वरने या दौऱ्यात सर्व क्रिकेट प्रकारात ५ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याबद्दल तो म्हणतो की, जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा जास्तीत जास्त बळी मिळविणे आवश्यक असते. तुम्ही ५ बळी मिळवत आहात की नाही, हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही संघाला विजय मिळवून देता का हे अधिक महत्त्वाचे असते.

भुवनेश्वरने सांगितले की, आम्ही फलंदाजी केल्यानंतर खेळपट्टीचा थोडा अंदाज आला. पण जेव्हा आम्ही गोलंदाजीला सुरुवात केली, तेव्हा खऱ्या अर्थाने खेळपट्टीचे स्वरूप स्पष्ट होऊ लागले. त्यानुसार मी पहिले षटक टाकले की, मी इतर गोलंदाजांशी संवाद साधतो आणि त्यांना इथे नेमकी कशी गोलंदाजी करायला हवी, याचा थोडा अंदाज देतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज