नवी दिल्ली
वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाल्याने सट्टेबाजांना जोरदार दणका बसला आहे. सेमीफायनलमध्ये भारत १८ धावांनी पराभूत झाल्याने सट्टेबाजांचे तब्बल १०० कोटी रुपये बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूझीलंडचा पराभव करून भारत वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारेल, असा अंदाज सट्टेबाजांना होता. परंतु, तो फोल ठरला आहे.
दिल्ली एनसीआरच्या सट्टेबाजारांना सर्वात मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. सट्टे बाजारात भारतावर ४.३५ रुपये तर न्यूझीलंडवर ४९ रुपये इतका भाव लावण्यात आला होता. भारताची धावसंख्या ६ गडी बाद २०० धावा होती. रवींद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनी मैदानावर खेळत होते, त्यावेळी सट्टेबाजांची भारताला पसंती होती. परंतु, अखेरच्या दोन षटकात न्यूझीलंडने जबरदस्त खेळ करीत सट्टेबाजांचा अंदाज चुकवला.
भारताचे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या ५ धावांवर तंबूत परतले. त्याचवेळी सट्टाबाजार बदलला. आमचे लक्ष मंगळवारी झालेल्या सामन्याकडे जास्त होते. परंतु, बुधवारी भारताला पराभवाचा धक्का बसल्याने सट्टेबाजारांचे पैसे बुडाल्याचे गुरूग्राममधील एक सट्टेबाज म्हणाला. भारताचा विजय झाल्यानंतर गुरुग्रामशिवाय गाझियाबाद, फरीदाबाद आणि दिल्लीत सट्टेबाजारांनी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्टी करण्याचे ठरवले होते. परंतु, भारताच्या पराभवानंतर सट्टेबाजांना हॉटेलमधील बुकिंग रद्द करावी लागली. न्यूझीलंडच्याबाजुने सट्टा लावणाऱा एक सट्टेबाज नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाला की, भारताचे चार गडी बाद झाल्यानंतर भारत पराभूत होईल, असे मला त्याचवेळी वाटले होते. जोखीम पत्करून मी माझा सर्व पैसा न्यूझीलंडवर लावला होता. भारताचा पराभव झाल्याने अखेर मला लॉटरी लागली, असं तो शेवटी म्हणाला.
वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाल्याने सट्टेबाजांना जोरदार दणका बसला आहे. सेमीफायनलमध्ये भारत १८ धावांनी पराभूत झाल्याने सट्टेबाजांचे तब्बल १०० कोटी रुपये बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूझीलंडचा पराभव करून भारत वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारेल, असा अंदाज सट्टेबाजांना होता. परंतु, तो फोल ठरला आहे.
दिल्ली एनसीआरच्या सट्टेबाजारांना सर्वात मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. सट्टे बाजारात भारतावर ४.३५ रुपये तर न्यूझीलंडवर ४९ रुपये इतका भाव लावण्यात आला होता. भारताची धावसंख्या ६ गडी बाद २०० धावा होती. रवींद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनी मैदानावर खेळत होते, त्यावेळी सट्टेबाजांची भारताला पसंती होती. परंतु, अखेरच्या दोन षटकात न्यूझीलंडने जबरदस्त खेळ करीत सट्टेबाजांचा अंदाज चुकवला.
भारताचे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या ५ धावांवर तंबूत परतले. त्याचवेळी सट्टाबाजार बदलला. आमचे लक्ष मंगळवारी झालेल्या सामन्याकडे जास्त होते. परंतु, बुधवारी भारताला पराभवाचा धक्का बसल्याने सट्टेबाजारांचे पैसे बुडाल्याचे गुरूग्राममधील एक सट्टेबाज म्हणाला. भारताचा विजय झाल्यानंतर गुरुग्रामशिवाय गाझियाबाद, फरीदाबाद आणि दिल्लीत सट्टेबाजारांनी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्टी करण्याचे ठरवले होते. परंतु, भारताच्या पराभवानंतर सट्टेबाजांना हॉटेलमधील बुकिंग रद्द करावी लागली. न्यूझीलंडच्याबाजुने सट्टा लावणाऱा एक सट्टेबाज नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाला की, भारताचे चार गडी बाद झाल्यानंतर भारत पराभूत होईल, असे मला त्याचवेळी वाटले होते. जोखीम पत्करून मी माझा सर्व पैसा न्यूझीलंडवर लावला होता. भारताचा पराभव झाल्याने अखेर मला लॉटरी लागली, असं तो शेवटी म्हणाला.