वृत्तसंस्था, लंडन
अनिल कुंबळेला भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून कायम ठेवायचे का, यावर चर्चा करण्यासाठी त्रिसदस्यीय सल्लागार समितीची बैठक गुरुवारी झाली खरी पण त्यांनी या विषयावर विचार करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे.
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण या समितीने जवळपास दोन तास चर्चा केली, पण कुंबळेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आणखी अवधी लागेल अशी विनंती त्यांनी बोर्डाचे सीईओ राहुल जोहरी यांच्याकडे केली.
भारतीय क्रिकेट बोर्डाचे हंगामी अध्यक्ष सी. के. खन्ना आणि आयपीएलचे कार्याध्यक्ष राजीव शुक्ला यांनी कुंबळेला बदलण्याविषयी जे वातावरण तयार केले जात आहे, त्याबद्दल नाराजी प्रकट केली होती.
या त्रिसदस्यीय समितीलाही कुंबळेला तडकाफडकी हटविणे योग्य वाटत नाही. आतापर्यंत झालेल्या भारताच्या १७ सामन्यांपैकी १२ सामन्यांत भारताला यश लाभलेले आहे, हे लक्षात घेऊन कुंबळेला हटविणे योग्य ठरणार नाही, अशीच भावना आहे. स्वतः खन्ना यांनी बोर्डाचे सचिव अमिताभ चौधरी यांना पत्र लिहून २६ जूनला होत असलेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेपर्यंत प्रशिक्षक निवड प्रक्रिया लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. याचा अर्थ, चॅम्पियन्स ट्रॉफी झाल्यानंतर कुंबळे भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाऊ शकतो. कुंबळेला जर जाता आले नाही तर सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर हंगामी प्रशिक्षक म्हणून काम पाहील.
अनिल कुंबळेला भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून कायम ठेवायचे का, यावर चर्चा करण्यासाठी त्रिसदस्यीय सल्लागार समितीची बैठक गुरुवारी झाली खरी पण त्यांनी या विषयावर विचार करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे.
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण या समितीने जवळपास दोन तास चर्चा केली, पण कुंबळेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आणखी अवधी लागेल अशी विनंती त्यांनी बोर्डाचे सीईओ राहुल जोहरी यांच्याकडे केली.
भारतीय क्रिकेट बोर्डाचे हंगामी अध्यक्ष सी. के. खन्ना आणि आयपीएलचे कार्याध्यक्ष राजीव शुक्ला यांनी कुंबळेला बदलण्याविषयी जे वातावरण तयार केले जात आहे, त्याबद्दल नाराजी प्रकट केली होती.
या त्रिसदस्यीय समितीलाही कुंबळेला तडकाफडकी हटविणे योग्य वाटत नाही. आतापर्यंत झालेल्या भारताच्या १७ सामन्यांपैकी १२ सामन्यांत भारताला यश लाभलेले आहे, हे लक्षात घेऊन कुंबळेला हटविणे योग्य ठरणार नाही, अशीच भावना आहे. स्वतः खन्ना यांनी बोर्डाचे सचिव अमिताभ चौधरी यांना पत्र लिहून २६ जूनला होत असलेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेपर्यंत प्रशिक्षक निवड प्रक्रिया लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. याचा अर्थ, चॅम्पियन्स ट्रॉफी झाल्यानंतर कुंबळे भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाऊ शकतो. कुंबळेला जर जाता आले नाही तर सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर हंगामी प्रशिक्षक म्हणून काम पाहील.