साउदम्पटन : चेतेश्वर पुजाराच्या शतकाच्या जोरावर भारताने मालिकेतील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडविरुद्ध ९ बाद २३२ धावा केल्या. अखेरचे वृत्त हाती आले पुजारा २१० चेंडूंत ११ चौकारांसह १०१ धावांवर खेळत होता. हे त्याचे कसोटीतील पंधरावे शतक ठरले. भारताच्या शिखर धवन (२३) आणि लोकेश राहुलला (१९) पहिल्या ५० धावांतच इंग्लंडने माघारी धाडले. यानंतर विराट कोहली मैदानात आला. त्याने चेतेश्वर पुजारासह भारताचा डाव सावरला. कोहलीने अँडरसनला चौकार मारून कसोटीतील ६ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. कमी डावांत हा टप्पा गाठणारा तो भारताचा सुनील गावसकर यांच्यानंतरचा दुसराच फलंदाज ठरला. कोहली-पुजारा जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावा केल्या. कोहली बाद झाल्यावर अजिंक्य रहाणे, रिषभ पंत बाद झाले. मोइन अलीने रिषभ पंत, हार्दिक पंड्या, आर. अश्विन आणि महंमद शमी यांना एकापाठोपाठ माघारी पाठवले.
शतकवीर पुजाराने सावरले
चेतेश्वर पुजाराच्या शतकाच्या जोरावर भारताने मालिकेतील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडविरुद्ध ९ बाद २३२ धावा केल्या...
Maharashtra Times 1 Sep 2018, 4:00 am