अ‍ॅपशहर

चॅम्पियन्स ट्रॉफी : भारतापुढे १९२ धावांचं आव्हान

चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतापुढे १९२ धावांचं आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा डाव ४४.३ षटकांत गडगडला. या सामन्यात विजयी ठरणाऱ्या संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार असल्याने या सामन्याला ‘उपांत्यपूर्व’ फेरीचे स्वरूप आले आहे.

Maharashtra Times 11 Jun 2017, 6:52 pm
मटा ऑनलाइन वृत्त । लंडन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम champions trophy india need 192 runs to reach semi final
चॅम्पियन्स ट्रॉफी : भारतापुढे १९२ धावांचं आव्हान


चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतापुढे १९२ धावांचं आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा डाव ४४.३ षटकांत गडगडला. या सामन्यात विजयी ठरणाऱ्या संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार असल्याने या सामन्याला ‘उपांत्यपूर्व’ फेरीचे स्वरूप आले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघातील क्विंटन डी कॉक याने सर्वाधिक ५३ धावा घेतल्या. त्यानंतर फाफ ड्युप्लेसिस (३६) आणि हाशिम अमला (३५) या दोनच खेळाडूंनी ३० पेक्षा अधिक धावा काढल्या. टीम इंडियाच्या भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा आणि आर. आश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. दोन फलंदाज धावचीत झाले.

३० षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पुरता गडगडला. १५७ धावांवर ५ गडी बाद होते. त्यानंतर लगेच दोन धावांत दोन रनआऊट झाले. त्यानंतर इतर गडीही बाद होत गेले आणि १९१ धावांतच दक्षिण आफ्रिकेचा संघ तंबूत परतला. भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. भारतीय संघात या सामन्यासाठी उमेश यादव या जलदगती गोलंदाजाऐवजी ऑफ स्पीनर आर. आश्विनचा समावेश करण्यात आला आहे तर दक्षिण आफ्रिकेनेही वेन पार्नेलऐवजी अॅंडिले फेहलुकवायोचा समावेश केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज