अ‍ॅपशहर

भारताने World Cup जिंकल्यावर बीसीसीआयने केला पैशांचा वर्षाव, जय शहा यांचे ट्विट व्हायरल

u19 Womens T20 World Cup :भारताने विश्वचषत जिंकला. त्यानंतर बीसीसीआयने त्यांच्यावर पैशांचा वर्षाव केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी एक ट्विट केले आहे आणि ते ते ट्विट आता चांगलेच व्हायरल झाले आहे. जय शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये भारतीय संघाला नेमकी किती रक्कम देणार असल्याचे आता जाहीर केले आहे, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 29 Jan 2023, 8:08 pm
नवी दिल्ली : भारताने आज इतिहास रचला आणि वर्ल्डकप जिंकला. भारताच्या युवा (१९ वर्षांखालील) संघातील महिलांनी इंग्लंडच्या टीमवर दणदणीत विजय साकारला. त्यामुळे आता बीसीसीआयदेखील आपल्या संघावर खूष झाला आहे आणि त्यांच्यावर पैशांच वर्षाव केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यावेळी एक ट्विट केले आहे आणि हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे.
भारताने युवा विश्वचषकाच्या अंतिम फेरी देदिप्यमान कामगिरी केली. भारताने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी स्विकारली होती. यावेळी गोलंदाजांनी हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. कारण भारताने पहिल्या षटकापासून इंग्लंडला धक्के द्यायला सुरुवात केली. भारताचा संघ फक्त पहिल्या षटकातच थांबला नाही तर त्यांनी एका मागून एक इंग्लंडला धक्के दिले. या धक्क्यातून इंग्लंडचा संघ सावरू शकला नाही त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम U19 Womens T20 World Cup
सौजन्य-ट्विटर


भारताने मात्र अचूक आणि भेदक गोलंदाजी केली व त्यामुळे त्यांना इंग्लंडच्या धावसंख्येला वेसण घालता आली. भारताने इंग्लंडचा डाव ६८ धावांवर आटोपला आणि त्यांनी विजयाचा पाया रचला. भारतासाठी ६९ धावांचे आव्हान हे फार थिटे वाटत असले तरी त्यांना सुरुवातीलाच दोन मोठे धक्के बसले. भारताची कर्णधार शेफाली वर्मा ही तिसऱ्या षटकात १५ धावांवर बाद झाली. भारतासाठी हा मोठा धक्का होता. कारण शेफाली ही अनुभवी खेळाडू होती आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा तिच्याकडे चांगला अनुभव होता. त्यामुळे भारताला तिसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला. त्यानंतर भारताला स्वेता सेहरावतच्या रुपात दुसरा धक्का बसला, स्वेताला यावेळी पाच धावा करता आल्या. भारताने पाचव्या षटकात आपेल दोन्ही ओपनर गमावले होते आणि त्यांची धावसंख्या २ बाद २० अशी झाली होती. पण त्यानंतर सौम्या तिवारीने भारताचा डाव सावरला. यावेळी सौम्याला त्रिशाने चांगली साथ दिली. त्यामुळे भारताला यावेळी सात विकेट्स राखत हा विश्वचषक जिंकता आला. त्यामुळे बीसीसीआय यावेळी खूष झाली असून त्यांनी भारतीय संघासाठी पाच कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज