अ‍ॅपशहर

रोहित शर्माच्या दुखापतीनंतर संघाला मिळणार नवा ओपनर, अन्याय झालेला खेळाडू मैदानात उतरणार

Rohit Sharma : रोहित शर्माला दुखापत झाली खरी, पण ही गोष्ट भारताच्या एका खेळाडूच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. कारण रोहित खेळणार नसल्यामुळे या अन्याय झालेल्या खेळाडूला आता संघात संघात मिळणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या खेळाडूला संधीच मिळत नव्हती. पण आता तिसऱ्या वनडे सामन्यात मात्र या खेळाडूला संघात स्थान मिळणार आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 8 Dec 2022, 8:33 pm
नवी दिल्ली : रोहित शर्माच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आता तिसऱ्या वनडे सामन्यात खेळणार नाही. पण रोहितची ही दुखापत आता भारताच्या एका खेळाडूच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. ज्या खेळाडूवर आतापर्यंत अन्याय झाला त्या खेळाडूला आता भारतीय संघात स्थान मिळणार असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IND VS BAN
सौजन्य-ट्विटर


भारतीय संघाने रिषभ पंतला फारच जास्त संधी दिल्या. पंत सातत्याने अपयशी ठरत असला तरी त्यालाच संधी मिळत होती. त्यामुळे भारतीय संघातील या खेळाडूवर अन्याय होत होता. पण आता रोहित शर्माच्या दुखापतीमुळे या खेळाडूचे नशिब बदलू शकते, असे दिसत आहे. कारण रोहितला दुखापत झाल्यामुळे तो आता खेळणार नाही आणि भारताला नवा सलामीवीर शोधावा लागेल. कारम लोकेश राहुल मधल्या फळीत चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे तो आता सलामीला येणार नाही. त्यामुळे भारताला सलामीसाठी आता नवीन ओपनर लागणार आहे.

गेल्या बऱ्याच महिन्यांपासून भारताचा यष्टीरक्षक आणि सलामीवीर इशान किशन हा संघाबाहेर आहे. इशानने आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले होते. पण रिषभ पंतला संघात सातत्याने संधी मिळत गेली आणि इशान हा संघाबाहेर फेकला गेला. आता रिषभ पंत तर बांगलादेशमध्ये पहिला सामना खेळला नाही. त्यावेळी राहुलने यष्टीरक्षणाची जबाबदारी पूर्ण केली. त्यानंतर दुसऱ्या वनडेमध्येही राहुल यष्टीरक्षण करत होता. त्यामुळे जर इशानला संघात स्थान देण्यात आले तर तो यष्टीरक्षण आणि सलामीवीर या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडू शकतो. त्यामुळे इशान किशन हा संघासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळे आता तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघात हा एक बदल होऊ शकतो.

भारतीय संघाला सध्याच्या घडीला दुखापतींची झळ चांगलीच बसली आहे. कारण बांगलादेशच्या दौऱ्यात आता भारताचा पाचवा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे भारतीय संघ सध्याच्या घडीला अडचणीत आहे. त्यामुळे भारतीय संघाला या पराभवाच्या परिस्थितीमधून इशान किशन बाहेर पडू शकतो, अशी आशा चाहत्यांना आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख