अ‍ॅपशहर

अजिंक्य रहाणेने दुखापतीवर स्वत: दिले मोठे अपडेट; दुसऱ्या डावात फलंदाजी करणार का? म्हणाला...

Ajinkya Rahane injury, WTC Final: अजिंक्य रहाणेच्या बोटाला झालेली दुखापत फारशी गंभीर आहे का, दुसऱ्या डावात तो फलंदाजीसाठी उतरणार की नाही; यावर खुद्द त्यानेच अपडेट दिले आहेतच जाणून घ्या काय म्हणाला.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jun 2023, 11:44 am
लंडन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग भारताला दुसऱ्या डावात करायचा आहे. हे लक्ष्य किती धावांचे असेल, हे सध्यातरी स्पष्ट झालेले नाही. पण, एक मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पहिल्या डावाचा हिरो अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावात फलंदाजी करू शकेल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रहाणेच्या दुखापतीमुळे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ajinkya Rahane Injury Update


रहाणेला दुखापत नेमकी कधी झाली?

पहिल्या डावात फलंदाजी करताना अजिंक्यला ही दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स २२ वे षटक टाकण्यासाठी आला तेव्हा हा प्रकार घडला. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रहाणेच्या बोटाला दुखापत झाली होती, त्यानंतर तो त्यावर टेप लावून खेळताना दिसला. आता या दुखापतीबाबत स्वतः अजिंक्य रहाणेने अपडेट दिले आहेत.

अजिंक्य रहाणेने दिले अपडेट

रहाणेने स्वतःच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहेत. पुढील डावात फलंदाजी करता येईल की नाही, हेही त्याने स्पष्ट केले. रहाणेने सामन्याच्या तिसऱ्या दिवसानंतर सांगितले, “ही दुखापत वेदनादायक आहे, परंतु मॅनेज करता येण्यासारखी आहे. याचा माझ्या फलंदाजीवर परिणाम होईल असे वाटत नाही, मी ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यामुळे आनंदी आहे. दिवस चांगला होता. आम्ही ३२०-३३० पर्यंत धावा करण्याच्या विचारात होतो. परंतु एकूणच तो चांगला दिवस होता."


भारतीय फलंदाज पुढे म्हणाला, “आम्ही चांगली गोलंदाजी केली. सर्वांनी पाठिंबा दिला. रहाणे पुढे कॅमेरून ग्रीनच्या झेलबद्दल बोलला, ज्याद्वारे तो बाद झाला. तो म्हणाला, “तो एक चांगला झेल होता. तो एक चांगला क्षेत्ररक्षक आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया थोडा पुढे आहे. सत्रानुसार खेळणे महत्त्वाचे आहे. पुढच्या दिवसाचा पहिला तास महत्त्वाचा असेल. आम्हाला माहित आहे की मजेदार गोष्टी घडू शकतात. जडेजाने खरोखरच चांगली गोलंदाजी केली, लेगवर्कने त्याला डाव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध मदत केली. तरीही वेगवान गोलंदाजांना विकेट मदत करेल असे वाटते."


१८ महिन्यांनंतर पुनरागमन

WTCच्या अंतिम फेरीच्या पहिल्या डावात रहाणेने १२९ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ८९ धावा केल्या. त्याचे शतक हुकले पण या खेळीदरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या. रहाणेने १८ महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना ही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. संघाला सर्वात जास्त गरज असताना त्याने आपल्या डावाने संघाला भक्कम जागी आणले. यामुळेच आता त्याच्याकडे टीम इंडियाचा संकटमोचक म्हणून पाहिले जात आहे.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज