अ‍ॅपशहर

'कपिल देव यांना भारतरत्न द्या'; माजी भारतीय क्रिकेटपटूने केली मागणी

कपिल देव यांनी घेतलेल्या शानदार झेलसाठीही हा सामना लक्षात राहिला. कपिल देव यांनी मिडविकेटवरून धावत जाताना व्हिव्ह रिचर्ड्सचा अप्रतिम झेल घेतला होता. आणि त्याच ठिकाणी सामना पलटला होता.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 11 Dec 2021, 1:26 pm
मुंबई : भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी इच्छा भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज दोड्डा गणेश यांनी व्यक्त केली आहे. कर्नाटकच्या या माजी वेगवान गोलंदाजाने यासंबंधाचे ट्विट आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम all rounder and 1983 wc winner captain kapil dev be awarded with bharat ratna says dodda ganesh
'कपिल देव यांना भारतरत्न द्या'; माजी भारतीय क्रिकेटपटूने केली मागणी


वाचा- कर्णधार ऋतुराज गायकवाडचा नाद करायचा नाही; केला मोठा पराक्रम

भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे. भारतीय संघाने १९८३ च्या विश्वचषक उंचावला होता, या विश्वचषकामुळेच सचिनला क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरणा मिळाली. त्यानंतर २०११ विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा पराभव करून भारतीय संघ दुसऱ्यांदा विश्वविजेता ठरला. त्यावेळी सचिन भारतीय संघाचा भाग होता.

वाचा- दक्षिण आफ्रिका दौरा सुरू होण्याआधी भारतीय संघाला बसला धक्का, पाहा काय झाले


वाचा- अ‍ॅशेस २०२१: साडेतीन दिवसात इंग्लंडचा खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाने घेतली १-० ने आघाडी

माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश यांचे मत आहे की, १९८३ चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांना भारतरत्नने सन्मानित केले जावे. कपिल देव हे १९८३ च्या विश्वचषक विजेतेपद जिंकण्यात भारतासाठी महत्त्वाचे खेळाडू ठरले होते.

वेस्ट इंडिजचा पराभव करून भारत बनला जगज्जेता
कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजचा ४३ धावांनी पराभव करून १९८३ चा विश्वचषक जिंकला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १८३ धावा केल्या होत्या. के. श्रीकांतने सर्वाधिक ३८ धावा केल्या होत्या.

वाचा- जो रुटने इतिहास घडवला; आता पाकिस्तानचा विक्रम धोक्यात आला

लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आणि दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिजला १४० धावांवर रोखून विजेतेपद पटकावले होते. मोहिंदर अमरनाथ यांना सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्यांनी गोलंदाजीत ७ षटकांत १२ धावांत ३ बळी घेतले होते. तसेच फलंदाजीतही अमरनाथ यांनी २६ धावांचे योगदान दिले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज