अ‍ॅपशहर

जसप्रीत बुमरा आणि इंग्लंडच्या खेळाडूमध्ये पहिल्याच दिवशी झाला वाद, व्हिडिओ जगभरात व्हायरल

जसप्रीत बुमराकडे या पहिल्यांदाच यावेळी भारताचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. पण कर्णधारपद भूषवल्यावर बुमराचा पहिल्याच दिवशी मोठा वाद झाला. या वादाचा व्हिडिओ जगभरात चांगलाच व्हायरल झाला आहे. बुमरा आणि इंग्लंडच्या खेळाडूत सामना सुरु होण्यापूर्वी नेमकं घडलं तरी काय, हे काही चाहत्यांना अजूनही समजलेले नाही. त्यामुळे व्हिडिओ पाहल्यावर ही गोष्ट त्यांना समजता येऊ शकेल.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 1 Jul 2022, 8:56 pm
बर्मिंगहम : जसप्रीत बुमराने आज प्रथमच भारताचे कर्णधारपद स्विकारले. पण भारताचे नेतृत्व स्विकारल्यावर बुमराचा पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या खेळाडूबरोबर वाद झाल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडिओ जगभरात चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम जसप्रीत बुमरा (सौजन्य-सोशल मीडिया)

नेमकं घडलं तरी काय, पाहा व्हिडिओ...
बुमराकडे भारताचे कर्णधारपद देण्यात आले आणि तो टॉससाठी मैदानात आला होता. टॉस उडवण्यात आला आणि बुमरा यावेळी टॉस हरला. इंग्लंडने यावेळी टॉस जिंकला आणि त्यांचा कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मार्क बुचरने यावेळी बुमराची छोटेखानी मुलाखत घेतली. त्यापूर्वी बुचरने सांगितले की, " भारतामध्ये पहिल्यांदाच असे पाहायला मिळत आहे की, एक वेगवान गोलंदाज कर्णधार झाला आहे." बुमराला ही गोष्ट पटली नाही आणि बुमरा म्हणला की, " कपिल देव यापूर्वी भारताचे कर्णधार होते आणि ते वेगवान गोलंदाजही होते." त्यावर बुचर शांत बसला नाही, तो म्हणाला की, " माझ्येमते कपिल देव हे अष्टपैलू खेळाडू होते." त्यानंतर बुमरा म्हणाला की, " तुम्हाला जर कपिल देव हे अष्टपैलू वाटत असेल तर ठीक आहे." त्यामुळे सामना सुरु होण्यापूर्वीच हा वाद रंगल्याचे पाहायला मिळाले.

जसप्रीत बुमराला इतिहास रचण्याची संधी...या एकमेव कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराला इतिहास रचण्याची संधी आहे. कारण यापूर्वी एकाही भारतीय कर्णधाराला इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे हा सामना भारताने अनिर्णीत राखला तरी त्यांना ही मालिका जिंकता येऊ शकते. कारण यापूर्वी या मालिकेत झालेल्या चार सामन्यांमध्ये भारताने २-१ अशी आघाडी घेतलली आहे. त्यामुळे या सामन्यात जर विजय मिळवला किंवा अनिर्णीत जरी राखला तरी त्यांना ही मालिका जिंकता येणार आहे. पण दुसरीकडे इंग्लंडने जर हा सामान जिंकला तर मालिका २-२ अशी बरोबरीतही होऊ शकते. त्यामुळे हा सामना बुमरासाठी सर्वात महत्वाचा असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज