अ‍ॅपशहर

Breaking...अर्जुन तेंडुलकर मुंबईचा संघ सोडणार, पाहा आता कोणत्या नवीन टीममध्ये एंट्री करणार

Mumbai : अर्जुनला मुंबई इंडियन्सच्या संघाने तब्बल दोन वेळा त्याला लिलावात आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे. पण आतापर्यंत एकदाही या संघाने त्याला खेळण्याची एकही संधी दिली नाही. गेल्या हंगामात मुंबईचा संघ आयपीएलमधून सर्वप्रथम बाहेर पडला होता. पण त्यावेळीही त्यांनी अर्जुनला संधी दिली नव्हती. आता अर्जुनने मुंबईचा संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 11 Aug 2022, 6:04 pm
मुंबई : क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसेल, अशी बातमी आता समोर आली आहे. कारण मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन आता मुंबईचा संघ सोडणार आहे. त्याचबरोबर आता कोणत्या संघाकडून यापुढे खेळायचे, याचा निर्णयही अर्जुनने घेतला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arjun tendulkar


वाचा-मुंबई इंडियन्सच्या नावात झाला मोठा बदल; आज अखेर केली घोषणा,

अर्जुन हा मुंबई इंडियन्सच्या संघाचा एक भाग आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने तब्बल दोन वेळा त्याला लिलावात आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे. पण आतापर्यंत एकदाही मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याला खेळण्याची एकही संधी दिली नाही. गेल्या हंगामात मुंबईच्या संघाने सलग आठ सामने हरले होते. या पराभवानंतर ते आयपीएल स्पर्धेतून बाद झाले होते. त्यामुळे मुंबईचा संघ त्याला संधी देईल, असे सर्वांना वाटत होते. पण अर्जुनच्या मागून आलेल्या गोलंदाजांना मुंबईच्या संघाने संधी दिली, पण अर्जुनला मात्र एकही सामना खेळवला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ अर्जुनला खेळवणार की नाही, असा प्रश्न चाहते विचारत होते. पण मुंबईच्या संघाने मोसम संपेपर्यंत त्याला एकदाही संधी दिली नाही.

वाचा-भारतीय संघात होणाऱ्या मोठ्या बदलांबाबत रोहित शर्माने अखेर सोडले मौन, पाहा काय

मुंबईच्या संघाकडून अर्जुन हा २०२०-२१ या मोसमात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील दोन सामने खेळला होता. या वर्षी त्याला एकही संधी न देता मुंबईच्या संघाने बाहेर केले होते. पण अर्जुनने मुंबई क्रिकेट संघटनेकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. त्यामुळे अर्जुन आता मुंबईचा संघ सोडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्जुनला मुंबई क्रिकेट संघनेने ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुले अर्जुनचा दुसऱ्या संघाकडून खेळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

वाचा-फुटबॉल विश्वचषकाच्या वेळापत्रकात मोठा बदल, पाहा पहिला सामना कधी सुरु होऊ

मुंबईच्या संघाला सोडून अर्जुन नेमका कोणत्या संघाकडून खेळणार, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. अर्जुन आता गोव्याच्या संघाकडून खेळणार असल्याचे समोर आले आहे. गोव्याच्या संघाला डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची नितांत गरज आहे, त्यामुळे अर्जुन तिथे खेळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अर्जुनला जास्तीत जास्त सामने खेळायची संधी मिळावी, यासाठी त्याने मुंबईच्या संघाला सोडण्याचा निर्णय घेतल्याचे आता समोर आले आहे. पण सचिन मुंबईकडून खेळून मोठा झाला असला तरी अर्जुन हाच संघ सोडून जात असल्यामुळे चाहत्यांमध्ये थोडी निराशा नक्कीच आहे. पण अर्जुन आता गोव्याच्या संघात कधी दाखल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज