अ‍ॅपशहर

अर्शदीप आणि चहरपुढे दक्षिण आफ्रिकेचे लोटांगण, पहिल्याच सामन्यात ओढवली मोठी नामुष्की

ind vs sa : आतापर्यंत जगभरात कोणत्या संघावर जी नामुष्की ओढवली नाही ती आज दक्षिण आफ्रिकेच्या संघावर ओढवली. आज पाहुण्यांचा अर्धा संघ हा फक्त ९ धावांमध्ये बाद झाला, तर २.३ षटकांमध्ये त्याला आपले पाच बळी गमवावे लागले. दक्षिण आफ्रिकेच्या संघावर या पहल्याच सामन्यात नेमकी कोणती नामुष्की ओढवली आहे, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 28 Sep 2022, 8:56 pm
थिरुवनंतरपुरम : अर्शदीप सिंग आणि दीपक चहर यांच्या भेदक गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेवर पहिल्यातच सामन्यात मोठी नामुष्की ओढवली. कारण आतापर्यंत जी वाईट गोष्ट कोणत्याही संघाबरोबर घडली नव्हती, ती दक्षिण आफ्रिकेबरोबर या सामन्यात घडल्यचे पाहायला मिळाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind vs sa
सौजन्य-ट्विटर


आजच्या सामन्यात दीपक चहर आणि अर्शदीप सिंग यांनी संघात पुनरागमन केले. पण पुनरामगन करत असताना या दोघांनी मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघाला एकामागून एक धक्के दिले. चहरने पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला आणि पहिल्या सलामीवीराला तंबूत धाडले. पण त्यानंतर दुसऱ्या षटकात तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाची संपूर्ण हवाच निघून गेली. कारण दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर अर्शदीप सिंगने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डीकॉकला बाद केले आणि भारताला दुसरे यश मिळवून दिले. अर्शदीप फक्त या एका विकेटवर थांबला नाही. या षटकात अजून दोन विकेट्स त्याने मिळवले.

अर्शदीपने दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रिली सोरोवला बाद केले. अर्शदीप यावर फक्त थांबला नाही. त्याने या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डेव्हिड मिलरला बाद केले आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची ४ बाद ८ अशी दयनीय अवस्था केली. अर्शदीपने सलग दोन विकेट्स काढल्या, त्यामुळे पुढच्या षटकातच्या पहिल्या चेंडूवर त्याला ह्रट्रीक मिळवण्याची संधी होती. पण भारतीय संघ फक्त या एकाच गोष्टीवर थांबला नाही. कारण त्यानंतरच्या षटकातही भारतीय संघाला यश मिळाले.

यावेळी तिसरे षटक हे पुन्हा टाकण्यासाठी दीपक चहर आला. दीपकने या तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्ट्रिस्टन स्टब्लला बाद केले आणि आफ्रिकेला यावेळी पाचवा धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ यावेळी गारद झाला आणि त्यांना फक्त ९ धावा करता आल्या होत्या. पण हा दक्षिण आफ्रिकेचा जगभरातील निच्चांक होता. कारण आतापर्यंत कोणत्याही संघाला २.३ षटकांमध्ये कोणत्याही संघाने पाच विकेट्स गमावलेल्या नाहीत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाबाबत ही लाजीरवाणी गोष्ट होती. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेचा संघ किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख