दुबई: रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान या सुपर फोरमधील दुसर्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर ५ विकेट्सने विजय मिळवला. भारतीय संघाने सामन्याची उत्तम सुरुवात केली खरी परंतु नंतर लागोपाठ पडणार्या विकेटमुळे भारतीय संघ गडबडताना दिसला. गोलंदाजीमध्ये देखील भारतीय गोलंदाजांनी प्रयत्नांनंतर विकेट्स मिळवले. या सामन्यानंतर रोहित शर्माने संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर भाष्य केले. भारताने हा सामना गमावला असला, तरी कर्णधार रोहित शर्माने संघाच्या कामगिरीवर आनंदी असल्याचे सांगितले. भारताच्या १८२ धावांच्या लक्ष्य गाठताना रिजवान (५१ चेंडूत ७१, सहा चौकार आणि दोन षटकार) आणि कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी केलेला नवाज (२० चेंडूत ४२, सहा चौकार, दोन षटकार) यांनी ७३ धावांची भागीदारी केली. १ चेंडू शिल्लक ठेवत पाकिस्तानने १८२ धावांचे लक्ष्य पूर्ण करत ५ विकेट्सने भारतावर विजय मिळवला.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर भारत आशिया कप स्पर्धेतून बाहेर पडला?
रिझवान आणि नवाज बाद झाल्यानंतर आसिफ अली (१६) आणि खुशदिल शाह (नाबाद १४) यांनी संघाचा विजय निश्चित केला. सामन्यानंतर रोहित म्हणाला, 'मला वाटते की ही चांगली धावसंख्या होती. कोणत्याही खेळपट्टीवर, कोणत्याही परिस्थितीत १८० धावा (१८१ धावा) ही चांगली धावसंख्या असते. पण मधल्या ओव्हर्समध्ये विकेट्स घेतल्या नाहीत तर गोष्टी कठीण होतात. आज खूप काही शिकायला मिळाले. खेळाडूंनी मात्र चांगले आव्हान दिले आणि आम्ही शेवटपर्यंत सामन्यात टिकून होतो. संघाच्या कामगिरीवर मी खूश आहे.'
ऋषभ पंतच्या खेळीवर संतापले चाहते, रोहित शर्माला ही खडे बोल सुनावले
रोहित म्हणाला की, हा खूप दबावात्मक सामना होता आणि संघाने शेवटपर्यंत संयम राखला. तो म्हणाला, 'हा खूप दबावात्मक सामना होता. रिझवान आणि नवाजची भागीदारी सुरू असताना आम्ही मधल्या षटकांमध्ये तसच शेवटच्या षटकांमध्येही शांत होतो, तेव्हा आम्ही संयम राखला. ही भागीदारी दीर्घकाळ टिकली आणि त्यांनी शानदार फलंदाजी केली.'
कोहली ४४ चेंडूत ६० धावा करून फॉर्ममध्ये परतला आणि रोहितने त्याचे कौतुक ही केले. रोहित म्हणाला, 'विराटचा फॉर्म उत्कृष्ट आहे, यात शंका नाही. प्रत्येक फलंदाजाने, विशेषत: विराटने आम्हाला ही धावसंख्या मिळविण्यात मदत केली, कारण आम्ही मधल्या फळीत काही महत्त्वपूर्ण विकेट गमावल्या.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर भारत आशिया कप स्पर्धेतून बाहेर पडला?
रिझवान आणि नवाज बाद झाल्यानंतर आसिफ अली (१६) आणि खुशदिल शाह (नाबाद १४) यांनी संघाचा विजय निश्चित केला. सामन्यानंतर रोहित म्हणाला, 'मला वाटते की ही चांगली धावसंख्या होती. कोणत्याही खेळपट्टीवर, कोणत्याही परिस्थितीत १८० धावा (१८१ धावा) ही चांगली धावसंख्या असते. पण मधल्या ओव्हर्समध्ये विकेट्स घेतल्या नाहीत तर गोष्टी कठीण होतात. आज खूप काही शिकायला मिळाले. खेळाडूंनी मात्र चांगले आव्हान दिले आणि आम्ही शेवटपर्यंत सामन्यात टिकून होतो. संघाच्या कामगिरीवर मी खूश आहे.'
ऋषभ पंतच्या खेळीवर संतापले चाहते, रोहित शर्माला ही खडे बोल सुनावले
रोहित म्हणाला की, हा खूप दबावात्मक सामना होता आणि संघाने शेवटपर्यंत संयम राखला. तो म्हणाला, 'हा खूप दबावात्मक सामना होता. रिझवान आणि नवाजची भागीदारी सुरू असताना आम्ही मधल्या षटकांमध्ये तसच शेवटच्या षटकांमध्येही शांत होतो, तेव्हा आम्ही संयम राखला. ही भागीदारी दीर्घकाळ टिकली आणि त्यांनी शानदार फलंदाजी केली.'
कोहली ४४ चेंडूत ६० धावा करून फॉर्ममध्ये परतला आणि रोहितने त्याचे कौतुक ही केले. रोहित म्हणाला, 'विराटचा फॉर्म उत्कृष्ट आहे, यात शंका नाही. प्रत्येक फलंदाजाने, विशेषत: विराटने आम्हाला ही धावसंख्या मिळविण्यात मदत केली, कारण आम्ही मधल्या फळीत काही महत्त्वपूर्ण विकेट गमावल्या.