अ‍ॅपशहर

भारत-पाकिस्तान Live सामना मोबाईलवर पाहण्यासाठी कोणती एक गोष्ट करावी लागेल, जाणून घ्या...

India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील सामना या रविवारी होणार आहे. पण रविवारी तुम्ही काही कामानिमित्त घराबाहेर पडणाल असाल, तर चिंता करू नका. कारण घराबाहेर असूनही हा सामना तुम्हाला लाइव्ह पाहता येऊ शकतो. पण हा सामना मोबाईलवर लाइव्ह पाहायचा असेल तर तुम्हाला काय करावे लागेल, पाहा...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 24 Aug 2022, 7:26 pm
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांचा सामना रविवारी रंगणार आहे. पण रविवारी जर कोणी चाहते घराबाहेर असतील तरी त्यांना हा सामना लाइव्ह पाहता येऊ शकतो. चाहत्यांना आपल्या मोबाईलवर हा सामना पाहता येणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind vs pak
सौजन्य-ट्विटर


वाचा-Asia cup सुरु होण्यापूर्वी भारतीय संघासाठी आली आनंदाची बातमी, रोहित शर्माला मोठा दिलासा...

भारत पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी होणार आहे. हा सामना तुम्हाला टॉसपासून पाहायचा असेल तर तुम्ही सात वाजता ऑनलाइन असायला हवं. भारताचा हा सामना तुम्ही लाइव्ह Disney Hotstar वर पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला हॉटस्टारचे subscription घ्यायला लागेल. त्याशिवाय तुम्हाला हा सामना मोबाईलवर लाइव्ह पाहता येणार नाही. त्यामुळे घराबाहेर असाल आणि तुम्हाला सामनाही चुकवायचा नसेल, तर हा एक चांगला पर्याय तुमच्यासमोर खुला आहे.

वाचा-शाहिद आफ्रिदी पुन्हा शिव्या खाणार... भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल आता काय म्हणाला पाहा...

आशिया चषकामध्ये आता सुपर-४ खेळवण्यात येणार आहे. आशिया कपमध्ये ६ संघ सहभागी होत आहेत. हे ६ संघ दोन गटात विभागलेले आहेत. भारत आणि पाकिस्तान अ गटात आहेत. तर ब गटात श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान आहेत. पात्रता फेरीतून एक संघ निवडला जाईल. २१ ऑगस्टपासून हाँगकाँग, यूएई, कुवेत आणि सिंगापूर या ४ संघांमधील पात्रता फेरी सामने सुरू झाले आहेत. पात्रता फेरीतील विजेता संघ भारत-पाकिस्तान गटात असेल. सहभागी झालेल्या या ६ संघांमध्ये एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत. यातील १० सामने दुबईत तर तीन सामने शारजाहमध्ये होणार आहेत. यामध्ये ग्रुप स्टेजमधील सर्व संघांमध्ये एकूण ६ सामने खेळवले जातील. यानंतर टॉप-२ संघ सुपर-४ मध्ये पोहोचतील, जिथे सर्व संघ एकमेकांविरुद्ध ६ सामने खेळतील. त्यानंतर सुपर-४ मधील टॉप-२ संघ अंतिम फेरीत विजेतेपदाचा सामना खेळतील. त्यामुळे आता सुपर -४ मध्ये कोणते संघ पोहोचतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

भारताचा संभाव्य संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख