मुंबई: १९ वर्षांखालील आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारताने बांगलादेशला नमवत विजेतेपद पटकावले. चुरशीच्या झालेल्या सामन्यात बेस्टच्या महिला वाहक वैदेही अंकोलेकर यांचा मुलगा आणि डावखुरा फिरकीपटू अथर्व अंकोलेकरचा सिंहाचा वाटा राहिला. अंतिम फेरीत अथर्वने चमकदार कामगिरी करत पाच बळी मिळवले. अंतिम फेरीत सामन्याचा मानकरी ठरलेल्या अथर्वचे रविवारी जोरदार स्वागत झाले.
अथर्वची कामगिरी स्वप्नवत होती अशी प्रतिक्रिया वैदेही अंकोलेकर यांनी दिली. भारतीयची फलंदाजी सुरू असताना मी बसमध्ये ड्युटीवर होते. त्यामुळे हा डाव पाहता आला नाही. तरिही अधूनमधून मोबाइलवर लाइव्ह अपडेट्स पाहता होते. अथर्व अवघ्या दोन धावा करून धावचित झाल्यामुळे मी काहीशी नाराज झाले होते असे वैदेही यांनी सांगितले. टीम इंडियाच्या गोलंदाजीच्या वेळी मात्र आपण घरी होतो. त्यामुळे मुलाची विजयी कामगिरी पाहता आल्याचे त्यांनी सांगितले. भारताने बांगलादेशला दिलेले १०७ धावांचे आव्हान माफक होते. मात्र, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत विजय खेचून आणला आणि त्यातही अथर्वची कामगिरी महत्त्वाची होती. त्यामुळे खूपच आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया वैदेही यांनी व्यक्त केली. अथर्वच्या यशात सर्वांचाच वाटा असल्याचे त्यांनी प्रांजळपणे सांगितले. परिसरातील लोकांनी अथर्वला मदत केली. त्यामुळे त्यांचाही या यशात वाटा असल्याचे वैदेही यांनी सांगितले. अथर्वला परिस्थितीची जाणीव असून वडिलांनी घेतलेल्या कष्टाची त्याला जाणीव असल्याचे वैदेही यांनी सांगितले. सामना संपल्यानंतरच अथर्वच्या स्वागताची जंगी तयारी सुरू झाली होती.
रविवारी सायंकाळी अथर्वचे मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी स्वागत केले. तो राहत असलेल्या गोविंदनगर एसआरए सोसायटीच्या परिसरात त्याचे मित्र, शेजारच्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अथर्वला खांद्यावर उचलून घेत त्याचे सोसायटीत स्वागत केले. गोविंदवाडी, प्रकाशवाडी, एकता चाळ, एमएनटी कंपाऊंड परिसरातील लोकांकडून त्याचे आपुलकीने स्वागत करण्यात आले. परिसरातील लोकांनी कायमच अथर्व आणि आम्हाला मदत केली. इथल्या लोकांच्या मनाची श्रीमंती खूपच मोठी असल्याचे कृतज्ञतापूर्वक उद्गार अथर्वची आई वैदेही यांनी काढले. अथर्वचे प्रशिक्षक अहिरे सर, प्रशांत शेट्टी सर यांनीही त्याला वेळोवेळी मदत केली असल्याचेही अथर्वच्या आईने 'मटा ऑनलाइन'सोबत बोलताना सांगितले. अथर्वच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर परिसरातील लोकांनी अथर्वला मानसिक आधार देत त्याचे मनोबल उंचावले असल्याचेही त्यांनी सांगितले. अथर्वचे वडील त्याच्यासह परिसरातील मुलांसोबत क्रिकेट खेळायचे. त्याची आठवण मुलांनी अजूनही ठेवली असल्याची भावना वैदेही अंकोलेकर यांनी सांगितले.
अथर्व १० वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्याची आई वैदेही यांनी खासगी शिकवणी घेत घराचा आर्थिक डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वैदेही या वाहक म्हणून बेस्टमध्ये रूजू झाल्या. तर, अथर्व रिझवी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
अथर्वची कामगिरी स्वप्नवत होती अशी प्रतिक्रिया वैदेही अंकोलेकर यांनी दिली. भारतीयची फलंदाजी सुरू असताना मी बसमध्ये ड्युटीवर होते. त्यामुळे हा डाव पाहता आला नाही. तरिही अधूनमधून मोबाइलवर लाइव्ह अपडेट्स पाहता होते. अथर्व अवघ्या दोन धावा करून धावचित झाल्यामुळे मी काहीशी नाराज झाले होते असे वैदेही यांनी सांगितले. टीम इंडियाच्या गोलंदाजीच्या वेळी मात्र आपण घरी होतो. त्यामुळे मुलाची विजयी कामगिरी पाहता आल्याचे त्यांनी सांगितले. भारताने बांगलादेशला दिलेले १०७ धावांचे आव्हान माफक होते. मात्र, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत विजय खेचून आणला आणि त्यातही अथर्वची कामगिरी महत्त्वाची होती. त्यामुळे खूपच आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया वैदेही यांनी व्यक्त केली. अथर्वच्या यशात सर्वांचाच वाटा असल्याचे त्यांनी प्रांजळपणे सांगितले. परिसरातील लोकांनी अथर्वला मदत केली. त्यामुळे त्यांचाही या यशात वाटा असल्याचे वैदेही यांनी सांगितले. अथर्वला परिस्थितीची जाणीव असून वडिलांनी घेतलेल्या कष्टाची त्याला जाणीव असल्याचे वैदेही यांनी सांगितले. सामना संपल्यानंतरच अथर्वच्या स्वागताची जंगी तयारी सुरू झाली होती.
रविवारी सायंकाळी अथर्वचे मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी स्वागत केले. तो राहत असलेल्या गोविंदनगर एसआरए सोसायटीच्या परिसरात त्याचे मित्र, शेजारच्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अथर्वला खांद्यावर उचलून घेत त्याचे सोसायटीत स्वागत केले. गोविंदवाडी, प्रकाशवाडी, एकता चाळ, एमएनटी कंपाऊंड परिसरातील लोकांकडून त्याचे आपुलकीने स्वागत करण्यात आले. परिसरातील लोकांनी कायमच अथर्व आणि आम्हाला मदत केली. इथल्या लोकांच्या मनाची श्रीमंती खूपच मोठी असल्याचे कृतज्ञतापूर्वक उद्गार अथर्वची आई वैदेही यांनी काढले. अथर्वचे प्रशिक्षक अहिरे सर, प्रशांत शेट्टी सर यांनीही त्याला वेळोवेळी मदत केली असल्याचेही अथर्वच्या आईने 'मटा ऑनलाइन'सोबत बोलताना सांगितले. अथर्वच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर परिसरातील लोकांनी अथर्वला मानसिक आधार देत त्याचे मनोबल उंचावले असल्याचेही त्यांनी सांगितले. अथर्वचे वडील त्याच्यासह परिसरातील मुलांसोबत क्रिकेट खेळायचे. त्याची आठवण मुलांनी अजूनही ठेवली असल्याची भावना वैदेही अंकोलेकर यांनी सांगितले.
अथर्व १० वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्याची आई वैदेही यांनी खासगी शिकवणी घेत घराचा आर्थिक डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वैदेही या वाहक म्हणून बेस्टमध्ये रूजू झाल्या. तर, अथर्व रिझवी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.