अ‍ॅपशहर

भारत-पाकिस्तानच्या सामन्यामुळे आशिया चषकाची तिकिट विक्री करणारी वेबसाईटच कोलमडली...

INDIA vs PAKISTAN : आशिया कपच्या तिकिटविक्रीचा कार्यक्रम जाहीर होत नसल्यामुळे चाहते नाराज होते. मात्र आशियाई क्रिकेट परिषदेने १५ ऑगस्टपासून ही तिकिटविक्री सुरू होईल असे शनिवारी जाहीर केले. त्यामुळे चाहते १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासूनच ऑनलाईन आले होते. चाहत्यांच्या जोरदार प्रतिसादामुळे संकेतस्थळ कोलमडले आणि ही तिकीटविक्री १५ ऑगस्टला दुपारपर्यंत सुरू झाली नव्हती.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 15 Aug 2022, 11:19 pm
दुबई : आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत अमीरातीत कमालीचे औत्सुक्य आहे. तब्बल सात लाख चाहत्यांनी या तिकिटाच्या खरेदीसाठी प्रयत्न केल्यामुळे आशिया कप टी-२० ची तिकीट विक्री करणारे संकेतस्थळच कोसळले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम asia cup 2022
सौजन्य-सोशल मीडिया


अमीरातीत क्वचितच महत्वाच्या क्रिकेट लढती होतात. मात्र भारत आणि पाकिस्तान सामन्याचे तिकीट कसे मिळणार हेच माहिती नाही, अशी नाराजी व्यक्त होत आहे. हा सामना होणाऱ्या दुबई इंटरनॅशनल स्टेडियमची क्षमता २५ हजार आहे, पण सात लाख चाहते तिकीटासाठी उत्सुक आहेत.

आशिया कप स्पर्धेची तिकिटविक्री १४ ऑगस्टच्या मध्यरात्री सुरू झाली. या स्पर्धेच्या ऑनलाईन तिकीटविक्रीचे हक्क प्लॅटिनमलिस्ट या अमीरातील लोकप्रिय संकेतस्थळाकडे आहेत. तिकीटविक्री सुरू झाल्यापासून तब्बल सात लाख चाहत्यांनी संकेतस्थळावरून तिकीट खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिकीट खरेदी करणे अवघड झाले. भारत आणि पाकिस्तान लढत २८ ऑगस्टला संध्याकाळी ७.३० वाजता आहे.

आशिया कपच्या तिकिटविक्रीचा कार्यक्रम जाहीर होत नसल्यामुळे चाहते नाराज होते. मात्र आशियाई क्रिकेट परिषदेने १५ ऑगस्टपासून ही तिकिटविक्री सुरू होईल असे शनिवारी जाहीर केले. त्यामुळे चाहते १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासूनच ऑनलाईन आले होते. चाहत्यांच्या जोरदार प्रतिसादामुळे संकेतस्थळ कोलमडले आणि ही तिकीटविक्री १५ ऑगस्टला दुपारपर्यंत सुरू झाली नव्हती. लवकरच तिकीटविक्री सुरू होईल, असेच संकेतस्थळावर सांगितले जात होते.

तिकीटांचे दर काय असतील, जाणून घ्या...आशियाच चषक स्पर्धेतील सामन्यांच्या तिकिटांचे भाव हे शहरांनुसार असणार आहेत. दुबईतील तिकीटं महाग तर शाहजामधील तिकिटं त्या मानाने स्वस्त आहेत. दुबईतील सामन्याचे कमी कमी किंमतीचे तिकीट हे ७५ दिरहम एवढे असणार आहे, भारताच्या रुपयांमधील त्याची किंमत ही १६२५ रुपये एवढी असणार आहे. पण शारजामध्ये मात्र यापेक्षा स्वस्त तिकीटं मिळणार आहेत. शारजामध्ये कमीत कमी तिकीट हे ३५ दिरहम एवढे असणार आहे, भारतीय रुपयांनुसार त्याची किंमत ही ७५० रुपये एवढी असणार आहे. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिकिटांचे भाव मात्र सर्वात जास्त असणार आहेत. या सामन्यासाठी सर्वात कमीत कमी किंमतीचे तिकिट हे जवळपास ४ हजार रुपयांपर्यंत असेल. पण जस जसा सामना जवळ येईल तशी या सामन्यांच्या तिकीटांचे भाव गगनाला भिडतील. पण या तिकीटी कुठे मिळतील, याची माहितीही आता समोर आली आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख