अ‍ॅपशहर

भारताचा लाजीरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता साकारला मोठा विजय

IND vs AUS : भारताला दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे लोटांगण घालण्याची वेळ आली. कारण भारताचा डाव हा फक्त ११७ धावांत आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता हा सामना सहजपणे जिंकला.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 19 Mar 2023, 7:26 pm
विशाखापट्टणम : भारतीय संघाला दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना भारताला फक्त ११७ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता हा सामना सहजपणे जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IND VS AUS 2ND ODI
सौजन्य-आयसीसी


या सामन्यात तर भारताचे पानीपत झाल्याचे पाहायला मिळाले. कारण या सामन्यात भारताच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी साकारता आली नाही. भारताचे फलंदाज एकामागून एक धारातिर्थी पडायला लागले आणि त्यामुळे त्यांचा डाव गडगडला. विराट कोहलीने भारताकडून सर्वाधिक ३१ धावा केल्या आणि त्यामुळेच संघाला ११७ धावा तरी करता आल्या. त्यानंतर भारतीय संघ गोलंदाजीत काही तरी कमाल दाखवेल, अशी भाबडी आशा चाहत्यांना होती. पण ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांनी यावेळी भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि त्यामुळे भारताला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख