अ‍ॅपशहर

भारताला घाबरवण्यासाठी Video शेअर केला पण तोंडावरच पडले, ऑस्ट्रेलियाने स्वतःचीच काढली इज्जत

IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला ९ फेब्रुवारीपासून नागपूरात सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Feb 2023, 1:43 pm
नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारीला नागपूर येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. सरावाव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन संघ माइंड गेम्सदेखील खेळत आहे, ज्यासाठी नेहमीच ओळखले जातात. सोमवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक व्हिडिओ पोस्ट करून टीम इंडियाला घाबरवण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Cricket Australia trolled by indian fans


खरं तर, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी अॅडलेड कसोटीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये टीम इंडिया अवघ्या ३६ धावांवर बाद झाली होती. ऑस्ट्रेलियाने हा व्हिडीओ का पोस्ट केला हं , हे कोणी सांगू शकत नसलं तरीही कांगारू संघ माईंडगेम्स खेळत असल्याचे यातून दिसत आहे. या व्हिडिओमधून ऑस्ट्रेलिया असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे कि या मालिकेतही ऑस्ट्रेलिया संघ भारताची अशीच हालत करणार आहे. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलिया संघाने पोस्ट केला खरा पण यामुळे कांगारू संघ चांगलच ट्रॉल झाला आहे.

वाचा: भारताच्या या खेळाडूचं नाव ऐकताच थरथर कापतो पाकिस्तान, वर्ल्ड कपमध्ये दोन वेळा दिला होता धक्का



चाहत्यांकडून क्रिकेट ऑस्ट्रेलिया ट्रोल

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत ३६ धावांवर ऑलआऊट झाल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता, परंतु त्यानंतर चाहत्यांनी ही मालिका टीम इंडियाने जिंकल्याची आठवण करून दिली. व्हिडीओ ट्विटर पोस्ट करत भारताच्या त्या विजयाची आणि ऑस्ट्रेलियाला दिलेल्या त्या जखमेची भारतीय चाहत्यांनी चांगलीच आठवण करून दिली. या मालिकेत टीम इंडियाने गाबावर आपला दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते.

हेही वाचा: Video: पाच महिन्यानंतर संघात परतला स्टार खेळाडू; भावनिक होत; म्हणाला, ही गोष्ट...


अॅडलेड कसोटी गमावल्यानंतर टीम इंडियाने मेलबर्नमधील पुढचा सामना ८ विकेटने जिंकला. यानंतर टीम इंडियाने सिडनीतील तिसरी कसोटी अनिर्णित ठेवली आणि चौथ्या कसोटीत भारताने गब्बामध्ये इतिहास रचत मालिकेत विजय मिळवला. टीम इंडियाने या सामन्यात ३ विक्स विजय नोंदवला आणि यासोबतच मालिकाही आपल्या नावावर केली. संघावर दबाव आणण्यासाठी ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला ३६ धावांवर ऑलआऊट केल्याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे पण भारताच्या चाहत्यांनी त्यांना चांगलेच उत्तर दिले आहे.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख