अ‍ॅपशहर

'अ‍ॅडम गिलख्रिस्टमुळेच रोहित शर्मा बनला एवढा मोठा कर्णधार' भारताच्या क्रिकेटपटूने असं का म्हटलं, पाहा...

आयपीएलमध्ये मिळालेल यश पाहता रोहित शर्माची भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असून त्याने न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन सामने जिंकून चांगली सुरुवात केली आहे. पण रोहितच्या या नेतृत्वामध्ये गिलख्रिस्टचा वाटा असल्यचे भारताच्या क्रिकेटपटूने म्हटले आहे.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 21 Nov 2021, 4:34 pm
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टमुळेच रोहित शर्मा इतका मोठा कर्णधार बनला आहे, असे माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझाने म्हटले आहे. रोहित शर्मा एक यशस्वी कर्णधार बनण्यामागे गिलख्रिस्टचा हात असल्याचे ओझाचे म्हणणे आहे. भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने डेक्कन चार्जर्स हैदराबाद संघातून आयपीएल कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यावेळी अ‍ॅडम गिलख्रिस्ट हैदराबाद संघाचा कर्णधार होता आणि त्याच्याच नेतृत्वाखाली रोहित शर्माने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम because of adam gilchrist that rohit sharma has become such a great captain
'अ‍ॅडम गिलख्रिस्टमुळेच रोहित शर्मा बनला एवढा मोठा कर्णधार' भारताच्या क्रिकेटपटूने असं का म्हटलं, पाहा...


गिलख्रिस्टनेच ओळखली रोहित शर्मातील प्रतिभा
कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या यशाचे बरेच श्रेय अ‍ॅडम गिलख्रिस्टला जाते, असे प्रज्ञान ओझाला वाटते. तो म्हणाला की, "रोहित शर्मा जरी मुंबई इंडियन्ससाठी उत्कृष्ट कर्णधार ठरला असला तरी, याचे श्रेय अ‍ॅडम गिलख्रिस्टला जाते. कारण गिलख्रिस्टनेच रोहित शर्माची प्रतिभा ओळखून त्याला डेक्कन चार्जर्स हैदराबाद संघाचा उपकर्णधार केले होते. त्या संघात अनेक वरिष्ठ खेळाडूही होते, पण गिलख्रिस्टने रोहित शर्माची उपकर्णधारपदासाठी निवड केली होती.

डेक्कन चार्जर्सकडून खेळल्यानंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा भाग बनला. २०१३ मध्ये रिकी पाँटिंगनंतर रोहितची मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर त्याने संपूर्ण संघाची स्थिती आणि दिशा बदलली. रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्ससाठी पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

दरम्यान, रांची येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात १५३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने हे लक्ष्य १७.२ षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताने जर रविवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात जर विजय मिळवला तर त्यांना न्यूझीलंडवर निर्भेळ यश संपादन करता येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज