नवी दिल्ली : भारताच्या संघात आता मोठा बदल करण्यात आला आहे. कारण भारताच्या वनडे संघाचे नेतृत्व हे शिखर धवनकडून काढून घेण्यात आले आहे. धवनला आता संघाचा उप कर्णधार बनवला असून संघाचे नेतृत्व आता युवा खेळाडूकडे सोपवण्यात आले आहे.
बीसीसीसीआयने झिम्बाब्वेच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली होती. या दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर करताना शिखर धवनकडे कर्णधारपद देण्यात आले होते. पण आता हा निर्णय बीसीसीआयने बदलला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त घोषित केल्यानंतर सलामीवीर केएल राहुल झिम्बाब्वेमध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
राहुलला दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी दुखापत झाली होती. या दुखापतीचे उपचार घेण्यासाठी तो जर्मनीला गेला होता. राहुल जर्मनीहून उपचार घेऊन आला आणि तो आता इंग्लंड दौऱ्यात खेळायला जाणार, असे वाटत होते. पण त्यावेळी राहुलला करोना झाला आणि त्याला इंग्लंड दौऱ्याला मुकावे लागले. करोनामधून बरा झाल्यावर राहुल आता झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाईल, असे वाटत होते. या दौऱ्यासाठी त्याच्याकडे संघाचे कर्णधारपदही देण्यात येऊ शकत होते. पण पुन्हा एकदा राहुलला दुखापत झाली. त्यामुळे राहुलला पुन्हा एकदा भारताच्या संघात स्थान मिळवता आले नाही. पण त्यानंतर आता त्याला आशिया चषक स्पर्धेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. राहुलला फक्त संघात स्थान मिळाले नाही तर त्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. पण तरीही तो या मालिकेत खेळू शकेल की नाही, याबाबत संदिग्धता होती. पण आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. या मालिकेत भारतीय संघ तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार) शिखर धवन (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
बीसीसीसीआयने झिम्बाब्वेच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली होती. या दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर करताना शिखर धवनकडे कर्णधारपद देण्यात आले होते. पण आता हा निर्णय बीसीसीआयने बदलला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त घोषित केल्यानंतर सलामीवीर केएल राहुल झिम्बाब्वेमध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
राहुलला दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी दुखापत झाली होती. या दुखापतीचे उपचार घेण्यासाठी तो जर्मनीला गेला होता. राहुल जर्मनीहून उपचार घेऊन आला आणि तो आता इंग्लंड दौऱ्यात खेळायला जाणार, असे वाटत होते. पण त्यावेळी राहुलला करोना झाला आणि त्याला इंग्लंड दौऱ्याला मुकावे लागले. करोनामधून बरा झाल्यावर राहुल आता झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाईल, असे वाटत होते. या दौऱ्यासाठी त्याच्याकडे संघाचे कर्णधारपदही देण्यात येऊ शकत होते. पण पुन्हा एकदा राहुलला दुखापत झाली. त्यामुळे राहुलला पुन्हा एकदा भारताच्या संघात स्थान मिळवता आले नाही. पण त्यानंतर आता त्याला आशिया चषक स्पर्धेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. राहुलला फक्त संघात स्थान मिळाले नाही तर त्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. पण तरीही तो या मालिकेत खेळू शकेल की नाही, याबाबत संदिग्धता होती. पण आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. या मालिकेत भारतीय संघ तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार) शिखर धवन (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.