अ‍ॅपशहर

बीसीसीआयचा मोठा योगायोग... एकाच दिवसात विराट कोहलीसह काढल्या दोन विकेट्स

BCCI : बीसीसीआयचा आता एक मोठा योगायोग समोर आला आहे. कारण एकाच दिवशी बीसीसीआयने दोन मोठ्या व्यक्तींना नारळ दिल्याचे आता समोर आले आहे. बीसीसीआयने एकाच दिवशी कोहलीसह भारतीय संघाच्या संबंधित असलेल्या कोणत्या मोठ्या व्यक्तीला डच्चू दिला आहे, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 19 Nov 2022, 7:32 pm
नवी दिल्ली : बीसीसीआयचं नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्न सध्याच्या घडीला चाहत्यांना पडला आहे. कारण बीसीसीआयने एकाच दिवशी विराट कोहलीसह दोन विकेट्स काढल्याचे आता समोर आले आहे. एकाच दिवशी बीसीसीआयने भारतीय क्रिकेटमधील दोन व्यक्तींचा गेम केल्याचे आता समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Team India
सौजन्य-ट्विटर


बीसीसीआयमध्ये गेल्या महिन्याभरात मोठे बदल झाले. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सौरव गांगुली यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडावे लागले आणि त्यांच्या जागी आता भारताच्या विश्वविजयी संघातील खेळाडू रॉजर बिन्नी यांची निवड करण्यात आली. बीसीसीआयचे अध्यक्ष बदलले खरे पण एका दिवसाचा योगायोग मात्र अजूनही कायम आहे. हा दिवस आहे तो १८ नोव्हेंबर.

रोहिकडे कर्णधारपद येण्यापूर्वी भारताचे नेतृत्व हे विराट कोहलीकडे होते. पण विराट कोहलीकडून वनडे संघाचे कर्णधारपद हे १८ नोव्हेंबरला काढून घेण्यात आले. त्यावेळी गांगुली हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. पण आता गांगुली या पदावर नाहीत. पण शुक्रवारी बीसीसीआयने भारतीय संघाची निवड समिती बरखास्त केली आणि सर्वांनाच मोठा धक्का दिला. शुक्रवारी तारीख होती ती १८ नोव्हेंबर. कर्णधार आणि निवड समिती अध्यक्ष ही कोणत्याही देशाच्या संघटनेतील महत्वाची पदं आहेत. पण ही दोन्ही पदावरील व्यक्तींना बीसीसीआयने एकाच दिवशी नारळ दिल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतीय क्रिकेटमधील हा एक मोठा योगायोग असल्याचे म्हटले जात आहे. कारण ज्या दिवशी विराटला वनडेचे कर्णधारपद सोडावे लागले तेव्हा चेतन शर्मा हेच निवड समितीचे अध्यक्ष होते. आता त्यांनाही याच दिवशी नारळ देण्यात आला आहे.

टी-२० विश्वचषकातील पराभवानंतर बीसीसीआयने कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. भारताच्या निवड समितीचा कार्यकाळ हा डिसेंबरमध्ये संपणार होता. पण त्यापूर्वीच बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केली आणि अध्यक्ष चेतन शर्मा यांना मोठा धक्का दिला. आता भारताच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी नेमकी कोणती व्यक्ती येते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये भारताला नवीन निवड समिती अध्यक्ष मिळू शकतो.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख