लंडन : भारतासाठी आता एक मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्मा शुक्रवारपासून एजबॅस्टन येथे सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटीला मुकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह या कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करेल, असेही म्हटेल जात आहे.
IND vs ENG पहिल्या कसोटीसाठी भारताचा कर्णधार कोण असेल, याची जोरदार चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. रोहितच्या क्वारंटानचा कालावधी हा २९ जूवला संपणार होता आणि त्यानंतर त्याची करोना चाचणी होणार होती. त्यामुळे रोहित शर्माची करोना चाचणी निगेटीव्ह आल्यावर तो भारतीय संघात ददाखल होईल आणि पहिला कसोटी सामना खेळेल, असे सर्वांनाच वाटत होते. पण त्याचवेळी रोहित हा पाचव्या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे आता जसप्रीत बुमराकडे संघाचे नेतृत्व पहिल्यांदा सोपवण्यात आले आहे. यापूर्वी बुमराने कधीच भारताचे नेतृत्व केले नव्हते.
रोहितनंतर भारतीय संघात सर्वात अनुभवी खेळाडू हा विराट कोहली होता. कोहलीने यापूर्वी भारताचे कर्णधारपद भूषवले आहे. त्यामुळे रोहित खेळणार नसेल तर कोहलीकडे कर्णधारपद देण्यात येईल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण निवड समितीने यावेळी कोहलीचा विचार न करता बुमराला कर्णधार केल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा बीसीसीआयने केलेली नाही. त्याचचबरोबर याबाबत स्पष्टपणे बोलण्यास बीसीसीआयने नकार दिला आहे.
पहिल्या कसोटी सामन्याची वेळ बदलली...भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या सामन्याची वेळ बदलली आहे. यापूर्वी इंग्लंडमध्ये सकाळी सामना हा ११.०० वाजता सुरु व्हायचा, पण हा सामना आता सकाळी १०.३० वाजता सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतामध्ये जो सामना दुपारी ३.३० सुरु व्हायचा तो आता ३.०० वाजता सुरु होणार आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी टॉस हा दुपारी २.३० वाजता होणार आहे आणि त्यानंतर अर्ध्या तासाने सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता हा सामना रात्री १०.०० वाजता संपणार आहे. त्यामुळे आता या नवीन वेळेनुसार हा कसोटी सामना होणार आहे.
IND vs ENG पहिल्या कसोटीसाठी भारताचा कर्णधार कोण असेल, याची जोरदार चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. रोहितच्या क्वारंटानचा कालावधी हा २९ जूवला संपणार होता आणि त्यानंतर त्याची करोना चाचणी होणार होती. त्यामुळे रोहित शर्माची करोना चाचणी निगेटीव्ह आल्यावर तो भारतीय संघात ददाखल होईल आणि पहिला कसोटी सामना खेळेल, असे सर्वांनाच वाटत होते. पण त्याचवेळी रोहित हा पाचव्या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे आता जसप्रीत बुमराकडे संघाचे नेतृत्व पहिल्यांदा सोपवण्यात आले आहे. यापूर्वी बुमराने कधीच भारताचे नेतृत्व केले नव्हते.
रोहितनंतर भारतीय संघात सर्वात अनुभवी खेळाडू हा विराट कोहली होता. कोहलीने यापूर्वी भारताचे कर्णधारपद भूषवले आहे. त्यामुळे रोहित खेळणार नसेल तर कोहलीकडे कर्णधारपद देण्यात येईल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण निवड समितीने यावेळी कोहलीचा विचार न करता बुमराला कर्णधार केल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा बीसीसीआयने केलेली नाही. त्याचचबरोबर याबाबत स्पष्टपणे बोलण्यास बीसीसीआयने नकार दिला आहे.
पहिल्या कसोटी सामन्याची वेळ बदलली...भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या सामन्याची वेळ बदलली आहे. यापूर्वी इंग्लंडमध्ये सकाळी सामना हा ११.०० वाजता सुरु व्हायचा, पण हा सामना आता सकाळी १०.३० वाजता सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतामध्ये जो सामना दुपारी ३.३० सुरु व्हायचा तो आता ३.०० वाजता सुरु होणार आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी टॉस हा दुपारी २.३० वाजता होणार आहे आणि त्यानंतर अर्ध्या तासाने सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता हा सामना रात्री १०.०० वाजता संपणार आहे. त्यामुळे आता या नवीन वेळेनुसार हा कसोटी सामना होणार आहे.