अ‍ॅपशहर

Breaking News: भारतीय क्रिकेट संघाला सर्वात मोठा झटका; जसप्रीत बुमराह टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियात पुढील महिन्यात १६ तारखेपासून आयसीसी टी-२० वर्ल्डकपला सुरूवात होत आहे. ही स्पर्धा तोंडावर आली असताना टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Sep 2022, 3:45 pm
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाला टी-२० वर्ल्डकपच्या आधी मोठा झटका बसला आहे. संघातील मुख्य जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Jasprit Bumrah


पुढील महिन्यात १६ तारखेपासून ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्डकप सुरू होत आहे. ही स्पर्धा तोंडावर आली असताना भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे आशिया कपमध्ये बुमराह खेळला नव्हता. तर त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने कमबॅक केले होते.

वाचा- आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अर्शदीपने इतिहास घडवला; आजवर कोणीही करू शकले नाही असा पराक्रम

बुमराहने २५ सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरची टी-२० मॅच खेळली होती. त्या सामन्यात बुमराहने ४ षटकात ५० धावा दिल्या होत्या. टी-२० मधील ही त्याची सर्वात वाईट कामगिरी होती.

वाचा-१०७ धावांचे टार्गेट असून देखील रोहित घाबरला होता; मॅच झाल्यानंतर एका वाक्यात केला विजयाचा खुलासा

बुमराहला चार आठवड्यांची विश्रांती घेण्यास सांगितले आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या सोबत आहे. निवड समिती त्याच्या जागी अन्य खेळाडूची टी-२० वर्ल्डकप संघात निवड करण्याची शक्यता आहे. टी-२० वर्ल्डकपच्या आधी भारतीय संघाला बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. याआधी ऑलराउंडर रविंद्र जडेजा देखील दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता.

बुमराह नसल्याने गमावला आशिया कप

दुखापतीमुळे बुमराह आशिया कप २०२२ खेळू शकला नव्हता. त्याचा फटका देखील संघाला बसला होता, भारताला अंतिम फेरीत पोहोचता आले नव्हते. तेव्हा गोलंदाजी भारताची सर्वात कमकूवत बाजू ठरली होती. आता पुन्हा एकदा तो संघाबाहेर नसल्यामुळे रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांची डोकेदुखी वाढू शकते.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, बुमराहला पाठीच्या दुखापतीचा त्रास आहे. त्यामुळे पुढील काही महिने तो मैदानाबाहेर असेल. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची पहिली मॅच २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

टी-२० वर्ल्डपकमधील भारतीय संघाचे वेळापत्रक

भारत विरुद्ध पाकिस्तान, २३ ऑक्टोबर- मेलबर्न
भारत विरुद्ध पात्रता फेरीतील संघ, २७ ऑक्टोबर, सिडनी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ३० ऑक्टोबर, पर्थ
भारत विरुद्ध बांगलादेश, २ नोव्हेंबर, एडिलेड ओव्हल

टी-२० वर्ल्डकपमधील भारताची आजवरची कामगिरी


२००७- विजेतेपद
२००९- दुसरी फेरी
२०१०- दुसरी फेरी
२०१२-दुसरी फेरी
२०१४- उपविजेतेपद
२०१६- सेमीफायनल
२०२१- पहिली फेरी
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख