अ‍ॅपशहर

पुढच्या वर्ल्डकपसाठी आत्ताच संघ बांधायला घ्या; रोहित नाही तर हा कर्णधार हवा, श्रीकांत यांचे मत

Team India : भारताला आता या विश्वचषकात मानहारीकारक पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आता पुढच्या विश्वचषकासाठी संघ बांधावा, अशी मागणी आता भारताच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष के. श्रीकांत यांनी केली आहे. त्याचबरोबर आता या विश्वचषकासाठी संघ बांधणी करत असताना कोणाला कर्णधार करायला हवे, हे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 14 Nov 2022, 11:29 pm
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील विश्वचषकात भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. त्यामुळे आता भारतीय संघाने पुढच्या विश्वचषकाचा विचार करायला हवा आणि त्यासाठी त्यांनी आपला कर्णधार बदलायला हवा, असे मत भारताच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष के. श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Team India
सौजन्य-ट्विटर


भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत म्हणाले की, "जर मी सध्या निवड समितीचा अध्यक्ष असतो तर विश्वचषकापर्यंत हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले असते. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेपासून संघाच्या पुनर्बांधणीला सुरुवात करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने त्यांच्या पाच पैकी चार सामने जिंकून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यावेळी ते गटात अव्वल स्थानावर होते. पण त्यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता संघात बदल करण्याची वेळ आली आहे.

श्रीकांत पुढे म्हणाले की,“पाहा, मी निवड समितीचा अध्यक्ष असतो तर २०२४ विश्वचषकापर्यंत हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले असते. आठवडाभरात न्यूझीलंड मालिका होणार असल्याने नव्या संघाची पुनर्बांधणी सुरू करावी. आपण समजून घेणे आवश्यक आहे की एखादा संध बांधायला जास्त वेळ लागतो. त्यासाठी फक्त सहा महिन्यांचा कालावधी पुरेसा नसतो. नवीन कर्णधाराला किमान १-२ वर्षे द्यायला हवीत. त्यामुळे जर आता संघ बांधणीला सुरुवात केली तरच पुढच्या विश्वचषकासाठी चांगला संघ बांधला जाऊ शकतो. मग तुम्ही एक संघ असा तयार करू शकता जो २०२३ पर्यंत सामने खेळेल. आपण आतापर्यंत जे तीन विश्वचषक जिंकलो, त्यामध्ये अष्टपैलू खेळाडूंची चांगली संख्या होती. त्यामुळे भारताला त्यावेळी विजय मिळवता आला होता. हीच गोष्ट यापुढेही करावी लागेल. सध्याच्या संघात जे अष्टपैलू खेळाडू आहेत त्यांना अधिक जबाबदारी देणे गरजेचे आहे. खासकरून दीपक हुडाला जास्त संधी द्यायला हवी. कारण त्याच्यामध्ये चांगली गुणवत्ता आहे, पण त्याला संधी मात्र मिळालेली नाही."
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख