मुंबई: अष्टपैलू फलंदाज महेंद्रसिंह धोनी चॅम्पियन आहे आणि चॅम्पियन कधी लवकर मैदान सोडत नाहीत, अशा शब्दांत बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेवर प्रतिक्रिया व्यक्त केली.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सौरव गांगुली यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी धोनीशी चर्चा करणार असल्याचंही सांगितलं. माझी अद्याप धोनीशी भेट झालेली नाही. मात्र त्याच्याशी चर्चा करून त्याच्या भविष्यातील योजना जाणून घेण्यात येतील. धोनी चॅम्पियन आहे आणि चॅम्पियन कधी लवकर मैदान सोडत नाहीत, असं सौरव यांनी स्पष्ट केलं. यावेळी सौरवने स्वत:चं उदाहरणही दिलं. मला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून दीड वर्ष बाहेर रहावं लागलं होतं. मात्र त्यानंतर मी संघात जोरदार पुनरागमन केलं आणि दोन वर्ष मैदानावर तळ ठोकला, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. भारतीय क्रिकेटला उंचीवर घेऊन जाण्याची विराटमध्ये क्षमता आहे. गेल्या ४-५ वर्षातील विराटचा खेळ पाहिल्यास तुम्हाला त्याची आपोआप जाणीव होईल. मी स्वत: टीम इंडियाचा कर्णधार होतो. त्यामुळे कर्णधाराच्या काय जबाबदाऱ्या असतात हे मी जाणून आहे, असं सांगतानाच उद्या गुरुवारी मी विराटशी चर्चा करणार आहे. विराट टीम इंडियाचा कर्णधार असून तो टीम इंडियाचा महत्त्वाचा कणा आहे. त्यामुळे आम्ही त्याला पूर्णपणे सहकार्य करणार आहोत, असंही गांगुलींनी सांगितलं. यावेळी गांगुलींनी बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून करण्यात येणाऱ्या भविष्यातील योजनांबद्दलही माहिती दिली. तसेच टीम इंडियाच्या कामगिरीवर आनंदही व्यक्त केला.
आम्ही ५ माजी क्रिकेटपटूंच्या हाती बीसीसीआय सोपवत आहोत. आता भारताच्या सर्वोत्तम माजी कर्णधाराच्या हातात बीसीसीआय आहे. आमचा कार्यकाळ संविधानानुसार पार पडला. संविधानानुसारच बीसीसीआयच्या निवडणुका घेण्यात आल्या. आमच्या हातात केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणं एवढंच होतं, असं प्रशासक समितीचे विनोद राय यांनी सांगितलं.
दुसरा भारतीय कर्णधार
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पोहोचणारे सौरव गांगुली हे दुसरे भारतीय कर्णधार आहेत. यापूर्वी माजी कर्णधार महाराजकुमार यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून सूत्रे स्विकारली होती. त्यांनी १९३६मध्ये तीन कसोटी सामन्यांसाठी भारताचं नेतृत्व केलं होतं. १९५४मध्ये ते बीसीसीआयचे अध्यक्ष झाले होते. तर २०१४मध्ये सुनील गावसकर यांना अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.
सौरव गांगुलीने स्वीकारला 'बीसीसीआय'च्या अध्यक्षपदाचा पदभार
सौरव काय म्हणाले?
>> बीसीसीआयला भ्रष्टाचार मुक्त करणार
>> धोनीचा आम्हाला अभिमान वाटतो. जोपर्यंत मी या पदावर आहे, तोपर्यंत धोनीला सन्मान मिळेल
>> विश्वसनीयता आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही
>> आता आम्ही प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवणार. तीन वर्षापूर्वी काय झाले याच्याशी आम्हाला घेणं नाही. आमच्या हातात ज्या गोष्टी आहे, त्यातून सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचं काम आम्ही करणार आहे
वाचा- गांगुली, धोनीबाबतचे प्रश्न विराटने 'असे' टोलवले!
BCCI: अध्यक्षपदासाठी पाठिंब्याच्या बदल्यात गांगुली करणार भाजपचा प्रचार?
बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सौरव गांगुली यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी धोनीशी चर्चा करणार असल्याचंही सांगितलं. माझी अद्याप धोनीशी भेट झालेली नाही. मात्र त्याच्याशी चर्चा करून त्याच्या भविष्यातील योजना जाणून घेण्यात येतील. धोनी चॅम्पियन आहे आणि चॅम्पियन कधी लवकर मैदान सोडत नाहीत, असं सौरव यांनी स्पष्ट केलं. यावेळी सौरवने स्वत:चं उदाहरणही दिलं. मला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून दीड वर्ष बाहेर रहावं लागलं होतं. मात्र त्यानंतर मी संघात जोरदार पुनरागमन केलं आणि दोन वर्ष मैदानावर तळ ठोकला, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. भारतीय क्रिकेटला उंचीवर घेऊन जाण्याची विराटमध्ये क्षमता आहे. गेल्या ४-५ वर्षातील विराटचा खेळ पाहिल्यास तुम्हाला त्याची आपोआप जाणीव होईल. मी स्वत: टीम इंडियाचा कर्णधार होतो. त्यामुळे कर्णधाराच्या काय जबाबदाऱ्या असतात हे मी जाणून आहे, असं सांगतानाच उद्या गुरुवारी मी विराटशी चर्चा करणार आहे. विराट टीम इंडियाचा कर्णधार असून तो टीम इंडियाचा महत्त्वाचा कणा आहे. त्यामुळे आम्ही त्याला पूर्णपणे सहकार्य करणार आहोत, असंही गांगुलींनी सांगितलं. यावेळी गांगुलींनी बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून करण्यात येणाऱ्या भविष्यातील योजनांबद्दलही माहिती दिली. तसेच टीम इंडियाच्या कामगिरीवर आनंदही व्यक्त केला.
आम्ही ५ माजी क्रिकेटपटूंच्या हाती बीसीसीआय सोपवत आहोत. आता भारताच्या सर्वोत्तम माजी कर्णधाराच्या हातात बीसीसीआय आहे. आमचा कार्यकाळ संविधानानुसार पार पडला. संविधानानुसारच बीसीसीआयच्या निवडणुका घेण्यात आल्या. आमच्या हातात केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणं एवढंच होतं, असं प्रशासक समितीचे विनोद राय यांनी सांगितलं.
दुसरा भारतीय कर्णधार
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पोहोचणारे सौरव गांगुली हे दुसरे भारतीय कर्णधार आहेत. यापूर्वी माजी कर्णधार महाराजकुमार यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून सूत्रे स्विकारली होती. त्यांनी १९३६मध्ये तीन कसोटी सामन्यांसाठी भारताचं नेतृत्व केलं होतं. १९५४मध्ये ते बीसीसीआयचे अध्यक्ष झाले होते. तर २०१४मध्ये सुनील गावसकर यांना अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.
सौरव गांगुलीने स्वीकारला 'बीसीसीआय'च्या अध्यक्षपदाचा पदभार
सौरव काय म्हणाले?
>> बीसीसीआयला भ्रष्टाचार मुक्त करणार
>> धोनीचा आम्हाला अभिमान वाटतो. जोपर्यंत मी या पदावर आहे, तोपर्यंत धोनीला सन्मान मिळेल
>> विश्वसनीयता आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही
>> आता आम्ही प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवणार. तीन वर्षापूर्वी काय झाले याच्याशी आम्हाला घेणं नाही. आमच्या हातात ज्या गोष्टी आहे, त्यातून सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचं काम आम्ही करणार आहे
वाचा- गांगुली, धोनीबाबतचे प्रश्न विराटने 'असे' टोलवले!
BCCI: अध्यक्षपदासाठी पाठिंब्याच्या बदल्यात गांगुली करणार भाजपचा प्रचार?