अ‍ॅपशहर

जिंकणाऱ्या सामन्यात पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव, हातून निसटलेल्या सामन्यात इंग्लंडची बाजी

PAK vs ENG : पाकिस्तानने पाच धावांत चार फलंदाज गमावले आणि त्यामुळे सामना चांगलाच रंगतदार अवस्थेत आला होता. कारण पाकिस्तान हा सामना सहज जिंकेल, असे वाटत होते. पण सामन्यात एक मोठा ट्विस्ट आला आणि त्यानंतर हा सामना फिरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पहिला कसोटी सामना नेमका कोण जिंकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 5 Dec 2022, 5:18 pm
रावळपिंडी : जिंकता, जिंकता सामना कसा गमवायचा, हे पाकिस्तानने आजच्या सामन्यात पुन्हा दाखवून दिले. इंग्लंडने पाकिस्तानपुढे विजयासाठी ३४३ धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तानने ४ बाद १९८ धावा करत विजयाची आशा निर्माण केली होती. पाकिस्तान हा सामना सहज जिंकेल, असे वाटत होते. पण पाकिस्तानने पाच धावांत चार विकेट्स गमावले आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानवर ७४ धावांनी दमदार विजय साकारला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम PAK vs ENG


इंग्लंडने पाकिस्तानपुढे ३४३ धावांचे मोठे आव्हान ठेवले, असे बऱ्याच जणांना वाटत होते. कारण सामन्याच्या पाचव्या दिवशी पाकिस्तानच्या संघाला जास्त धावा होतील, असे वाटत नव्हते. पण रावळपिंडीची खेळपट्टी ही पाटा असल्यामुळे पाकिस्तानला धावा करणे सोपे गेले. त्यामुळे पाकिस्तानने सामन्याच्या पाचव्या दिवशी दमदार फलंदाजी करत सामन्यावर पकड मजबूत केली होती.

चौथ्या दिवशीच्या अखेरीस पाकिस्तानची २ बाद ८० अशी स्थिती होती. त्यानंतर पाचव्या दिवशी पाकिस्तानने दमदार फलंदाजी केली. खासकरून सौद शकिलने यावेळी १२ चौकारांच्या जोरावर ७६ धावांची दमदार खेळी साकारली. सौद यावेळी पाकिस्तानला विजयापर्यंत पोहोचवेल, असे वाटत होते. पण त्यानंतर सामन्यामध्ये मोठा ट्विस्ट आला. कारण पाकिस्तानची ४ बाद १९८ अशी स्थिती होती. पण त्यावेळी रॉबिन्सनने सौदला बाद केले आणि पाकिस्तानला मोठा धक्का बसला.

सौदला बाद केल्यावर पाकिस्तानचा संघ चांगलाच आक्रमक झाला आणि त्यांनी ही आक्रमकता आपल्या गोलंदाजीत दाखवून दिली. कारण एकेकाळी पाकिस्तानचा संघ हा ४ बाद १९८ अशा सुस्थितीत होता. पण सौद बाद झाला आणि त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली. कारण त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपल्यासाठी धोकादायक असलेल्या आघा सलमानला ३० धावांवर बाद केले. त्यावेळी पाकिस्तानची ५ बाद २५९ अशी स्थिती होती. कारण त्यानंतर फक्त पाच धावांमध्ये पाकिस्तानचे चार फलंदाज बाद झाले. त्यामुळे पाकिस्तानची ९ बाद २६४ अशी दयनीय अवस्था झाली. त्यामुळे एकेकाळी पाकिस्तानचा संघ हा सामना सहज जिंकेल, असे वाटत होते. पण चार विकेट्स झटपट गेल्यामुळे पाकिस्तानचा संघ पराभवाच्या छायेत पाहायला मिळत होता. कारण पाकिस्तानची अखेरची जोडी एवढे मोठे आव्हान पार करेल, असे वाटत नव्हते. त्यामुळे इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हा पहिला सामना कोण जिंकणार, याची चुरस निर्माण झाली होती.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख