अ‍ॅपशहर

रोहितचा फॉर्म्यूला क्लिक झाला; एकटा हार्दिक ठरला पाकिस्तानवर भारी

Hardik Pandya: आशिया कप २०२२च्या पहिल्या लढती भारताने पाकिस्तानचा पाच विकेटनी पराभव केला आणि गेल्या वर्षी याच मैदानावर झालेल्या पराभवाची परतफेड केली.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Aug 2022, 12:35 am
दुबई: साधारण एका वर्षापूर्वी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर टी-२० वर्ल्डकपच्या ग्रुप फेरीत पाकिस्तानने भारताचा १० विकेटनी पराभव केला होता. आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात भारताचा झालेला पाकिस्तानविरुद्धचा तो पहिला पराभव होता आणि त्यामुळेच जिव्हारी देखील लागला. त्या सामन्यात ज्या खेळाडूंना व्हिलन ठरवण्यात आले होते त्यामध्ये हार्दिक पंड्याचा देखील समावेश होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Hardik Pandya


आज दुबईच्या त्याच मैदानावर भारताने आशिया कपच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेटनी पराभव केला आणि विजयाचा हिरो ठरला गेल्या वेळीचा व्हिलन हार्दिक पंड्या होय.

वाचा- हार्दिक पंड्याच्या वादळासमोर पाकिस्तानचा धुरळा उडाला, भारताचा ५ विकेटनी विजय

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितने या सामन्यासाठी एक धक्कादायक निर्णय घेतला होता. अंतिम ११ मध्ये ऋषभ पंतच्या जाीग दिनेश कार्तिकला समावेश केला गेला. रोहितने या सामन्यात एक अतिरिक्त गोलंदाज ठेवला आणि त्याच खेळाडूने संघाला विजय मिळवून दिला.

रोहितने हार्दिक पंड्याला अतिरिक्त जलद गोलंदाज म्हणून संघात स्थान दिले आणि त्याच हार्दिकने पाकिस्तानला धुळ चारली. हार्दिकने ४ षटकात २५ धावा देत ३ विकेट घेतल्या. हार्दिकने अशा वेळी भारताला विकेट मिळून दिल्या जेव्हा पाकिस्तानच्या फलंदाजाकडून मोठी धावसंख्या होऊ शकली असती. त्याने पाकिस्तानच्या फलंदाजांना बाउंसर चेंडू टाकून अडचणीत आणले. त्याला भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि अर्शदीप सिंह यांनी सुरेख साथ दिली.

वाचा- कौतुक करावं तेवढं कमीच! कोविडमधून बाहेर येताच द्रविड पोहचले मैदानात, राष्ट्रगीत सुरू

गोलंदाजी झाल्यानंतर फलंदाजीत देखील हार्दिकने कमाल केली. सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर तो मैदानावर आला. तेव्हा भारताच्या ४ बाद ८९ धावा झाल्या होत्या. त्याने रविंद्र जडेजासोबत ३२ चेंडूत ५० धावांची भागिदारी केली. अखेरच्या दोन षटकात त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. इतक नाही तर २०व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कडकडीत षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.

वाचा- पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने इतिहास घडवला; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू

हार्दिकने १७ चेंडूत १ षटकार आणि ४ चौकारांसह नाबाद ३३ धावा केल्या. त्याच्या या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख