अ‍ॅपशहर

हार्दिकने केला विराटचा अपमान, कॅप्टन झाला अन् रंग बदलला, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं काय घडलं

IND vs AUS : हार्दिक पंड्या हा रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारताचा कर्णधार पहिल्या वनडेत होता. संघाचे नेतृत्व करत असताना त्याने विराट कोहलीचा अपमान केल्याचे आता समोर आले आहे. हार्दिकचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक आणि रोहित यांच्यात नेमकं घडलं तरी काय होतं ते स्पष्टपणे दिसत आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 17 Mar 2023, 10:13 pm
मुंबई : कॅप्टन झाल्यावर एखाद्या खेळाडूचा रंग कसा काय बदलू शकतो, याचे उत्तम उदाहरण पहिल्या वनडे सामन्यात पाहायला मिळाले. कारण रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक भारताचे नेतृत्व करत होता. पण कर्णधारपद मिळाल्यावर मात्र त्याने कोहलीचा अपमान केल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.
ही गोष्ट घडली ती सामन्याच्या २१ व्या षटकात. यावेळी भारताचा कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. त्यावेळी हार्दिक पंड्या हा फिल्डिंगबाबत एक निर्णय घेत असल्याचे दिसत होते. हार्दिकच्या जवळ विराट कोहली होता आणि हार्दिकला सल्ला देत असल्याचे पाहायला मिळाले. पण हार्दिकने विराटकडे पाहिलेच नाही. हार्दिक यावेळी आपल्याच निर्णयावर कायम राहीला आणि त्याने कोहलीसारख्या अनुभवी खेळाडूचा अपमान केल्याची भावना काही क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे. कारण संघाचा कर्णधार कोणीही असला तरी संघातील अनुभवी खेळाडू हे सल्ले देत असतात आणि कर्णधार ते ऐकून घेत असतात. हे सल्ले ऐकून घेतल्यावर काय करायचे हा निर्णय कर्णधाराचा असतो. पण पण कर्णधाराने संघातील अनुभवी खेळाडूंचे सल्ले ऐकायला हवेत, असे म्हटले जाते. पण हार्दिकने यावेळी विराटकडे कानाडोळा करत त्याचा अपमान केल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IND vs AUS 1ST ODI
सौजन्य-ट्विटर


यापूर्वीही विराट आणि हार्दिक यांच्यामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. श्रीलंकेबरोबरचा सामना सुरु असताना हार्दिक आणि विराट फलंदाजी करत होते. त्यावेळी कोहली हा स्ट्राइकवर होता आणि त्यावेळी विराटला दोन धावा हव्या होत्या. विराटने पहिली धाव जोरात घेतली आणि तो दुसरी धाव घेण्यासाठी धावला होता. पण हार्दिकने यावेळी दुसरी धाव घेण्यास नकार दिला. पण तोपर्यंत कोहली हा अर्ध्या पीचपर्यंत आला होता. त्यावेळी कोहली हार्दिकवर चांगलाच भडकला होता. त्यानंतर हार्दिक आणि कोहली एकत्र आले तेव्हा त्यांच्यामध्ये विस्तवही जात नसल्याचे पाहायला मिळाले होते. पण आता कर्णधार झाल्यावर हार्दिक कोहलीचे काहीच ऐकत नसल्याचे पाहायला मिळाले.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज