वृत्तसंस्था, मुंबई
१९ वर्षांखालील मुलांच्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान उपांत्य सामन्याच्या निमित्ताने भारताच्या युवा संघाचा सक्षम खेळ पाहायला मिळेल, असा विश्वास भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याने व्यक्त केला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७४ धावांनी मोठा विजय मिळवून उपांत्य फेरीत धडक मारली होती. तर पाकिस्तानने उपांत्यपूर्व फेरीत अफगाणिस्तावर सहज विजय संपादन केला होता.
एका कार्यक्रमाला आलेला असताना झहीर खानने मत व्यक्त केले की, १९ वर्षांखालील मुलांचा भारतीय संघ जबरदस्त कामगिरी करत आहे. काहीवेळा ते कठीण परिस्थितीत सापडले होते पण जोरदार प्रत्युत्तर देत त्यांनी विजयही मिळविला. जेव्हा भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना होणार असतो तेव्हा त्या स्पर्धेला एक वेगळी उंची प्राप्त होते. भारतीय संघ या परिस्थितीत आपला खेळ आणखी उंचावून दर्जेदार कामगिरी करेल अशी आशा आहे.
वाचा- भारतीय संघाची घोषणा; रोहितच्या जागी मयांक आणि शुभमनची निवड!
झहीर खानने मुंबईच्या यशस्वी जयस्वालचेही कौतुक केले. यशस्वी जयस्वाल सध्या १९ वर्षांखालील मुलांच्या या संघातून चमक दाखवत आहे. झहीर म्हणाला की, स्थानिक क्रिकेटमध्ये यशस्वीने आपल्या फलंदाजीची छाप पाडली आहे. त्यामुळे वर्ल्डकप उपांत्य फेरीतही माझ्याकडून त्याला खूप शुभेच्छा. त्याने भारताला चांगली सुरुवात करून द्यावी अशी मला अपेक्षा आहे.
झहीर खानने या युवा वर्ल्डकपच्या निमित्ताने आपल्या आठवणींना वाट मोकळी करून दिली. २००३च्या वर्ल्डकपमध्ये झहीर खेळला होता. तेव्हा त्याला पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीतला थरार त्याला अनुभवता आला होता.
वाचा- सचिनची ताडोबा भेट; शेअर केला अविस्मरणीय व्हिडिओ!
भारताचे पारडे जड?
पोटशेफस्ट्रूम : दरम्यान, भारत आणि पाकिस्तान हे संघ युवा वर्ल्डकपमध्ये एकही सामना न गमावता उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले आहेत. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद हुरेराने म्हटले होते की, या सामन्यावर सगळ्यांचा नजरा आहेत पण आम्ही एक सर्वसामान्य लढत असल्याप्रमाणेच त्यात खेळणार आहोत.
वाचा-न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाची चूक; ICCने केला दंड!
भारत या स्पर्धेचा गतविजेता आहे. गेल्या वर्ल्डकपमध्ये भारताने पाकवर मात केली होती. भारताच्या अपेक्षा सलामीवीर यशस्वी जयस्वाल, गोलंदाज कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, रवी बिष्णोई यांच्यावर अवलंबून आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान (उपांत्य लढत)
दुपारी १.३० पासून
१९ वर्षांखालील मुलांच्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान उपांत्य सामन्याच्या निमित्ताने भारताच्या युवा संघाचा सक्षम खेळ पाहायला मिळेल, असा विश्वास भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याने व्यक्त केला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७४ धावांनी मोठा विजय मिळवून उपांत्य फेरीत धडक मारली होती. तर पाकिस्तानने उपांत्यपूर्व फेरीत अफगाणिस्तावर सहज विजय संपादन केला होता.
एका कार्यक्रमाला आलेला असताना झहीर खानने मत व्यक्त केले की, १९ वर्षांखालील मुलांचा भारतीय संघ जबरदस्त कामगिरी करत आहे. काहीवेळा ते कठीण परिस्थितीत सापडले होते पण जोरदार प्रत्युत्तर देत त्यांनी विजयही मिळविला. जेव्हा भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना होणार असतो तेव्हा त्या स्पर्धेला एक वेगळी उंची प्राप्त होते. भारतीय संघ या परिस्थितीत आपला खेळ आणखी उंचावून दर्जेदार कामगिरी करेल अशी आशा आहे.
वाचा- भारतीय संघाची घोषणा; रोहितच्या जागी मयांक आणि शुभमनची निवड!
झहीर खानने मुंबईच्या यशस्वी जयस्वालचेही कौतुक केले. यशस्वी जयस्वाल सध्या १९ वर्षांखालील मुलांच्या या संघातून चमक दाखवत आहे. झहीर म्हणाला की, स्थानिक क्रिकेटमध्ये यशस्वीने आपल्या फलंदाजीची छाप पाडली आहे. त्यामुळे वर्ल्डकप उपांत्य फेरीतही माझ्याकडून त्याला खूप शुभेच्छा. त्याने भारताला चांगली सुरुवात करून द्यावी अशी मला अपेक्षा आहे.
झहीर खानने या युवा वर्ल्डकपच्या निमित्ताने आपल्या आठवणींना वाट मोकळी करून दिली. २००३च्या वर्ल्डकपमध्ये झहीर खेळला होता. तेव्हा त्याला पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीतला थरार त्याला अनुभवता आला होता.
वाचा- सचिनची ताडोबा भेट; शेअर केला अविस्मरणीय व्हिडिओ!
भारताचे पारडे जड?
पोटशेफस्ट्रूम : दरम्यान, भारत आणि पाकिस्तान हे संघ युवा वर्ल्डकपमध्ये एकही सामना न गमावता उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले आहेत. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद हुरेराने म्हटले होते की, या सामन्यावर सगळ्यांचा नजरा आहेत पण आम्ही एक सर्वसामान्य लढत असल्याप्रमाणेच त्यात खेळणार आहोत.
वाचा-न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाची चूक; ICCने केला दंड!
भारत या स्पर्धेचा गतविजेता आहे. गेल्या वर्ल्डकपमध्ये भारताने पाकवर मात केली होती. भारताच्या अपेक्षा सलामीवीर यशस्वी जयस्वाल, गोलंदाज कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, रवी बिष्णोई यांच्यावर अवलंबून आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान (उपांत्य लढत)
दुपारी १.३० पासून