अ‍ॅपशहर

विश्वचषकात भारत ठरवून हरला होता का? स्टोक्सने केला खुलासा

गेल्या वर्षी जून महिन्यात झालेल्या विश्वचषकात भारत इंग्लंडकडून ठरवून हरला होता, असे वक्तव्य इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने केल्याचे एका पुस्तकात म्हटले होते. भारत खरंच विश्वचषकात ठरवून हरला होता का, जाणून घ्या स्टोक्स काय म्हणतो...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 May 2020, 9:13 pm
विश्वचषकात भारतीय संघ इंग्लंडकडून ठरवून पराभूत झाला होता. कारण त्यांना पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचू द्यायचे नव्हते, असे इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सने सांगितल्याची चर्चा होती. या गोष्टीवर आता दस्तुरखुद्द स्टोक्सनेच खुलासा केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ben stokes1


पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्तने एक पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकामध्ये बख्त यांनी बेन स्टोकचा हवाला देत, भारत विश्वचषकात इंग्लंडकडून ठरवून हरला, असे म्हटले गेले होते. यावर आता स्टोक्स काय म्हणाला, पाहा...


विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये एक सामना झाला होता. या सामन्यात इंग्लंडने ३३८ धावांचे लक्ष्य भारतापुढे ठेवले होते. हा सामना भारत जिंकला असता तर पाकिस्तानला उपांत्य फेरीत काही समीकरणांच्या आधारावर पोहोचण्याची संधी होती. पण या सामन्यात भारताला ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचला आले नव्हते.


स्टोक्स नेमकं काय म्हणाला...स्टोक्सने सिकंदर बख्त यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचा खुलासा केला आहे. स्टोक्सने याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये स्टोक्स म्हणाला की, " सिकंदर जे बोलत आहे, ते तुम्ही कुठेही शोधायला जाऊ नका. कारण मी तसे काहीच बोललेलो नाही. काही शब्दांची हेराफेरी करून स्वत:ला प्रकोशझोतात आणण्यासाठी त्यांनी ही गोष्ट केली असावी."

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज