अ‍ॅपशहर

IND vs PAK: टी-२० वर्ल्डकप: भारताची लढत पाकिस्तानविरुद्ध; कधी, कुठे जाणून घ्या सर्व तपशील

ICC Womens T20 World Cup: आयसीसी महिला वर्ल्डकपच्या नवव्या हंगामाला आजपासून दक्षिण आफ्रिकेत सुरूवात होत आहे. या स्पर्धेत भारताची पहिली लढत पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Feb 2023, 10:44 am
नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेत आजपासून महिला टी-२० वर्ल्डकपला सुरूवात होत आहे. यजमान दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात पहिली लढत होईल. स्पर्धेला सुरूवात आजपासून होत असली तरी उद्या रविवारी १२ मार्च रोजी होणाऱ्या लढतीवर सर्वांची नजर असेल. भारतीय महिला संघ उद्या पहिली मॅच पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind women


टी-२० वर्ल्डकपमध्ये १० संघ असून ही स्पर्धा १७ दिवस चालणार आहे. स्पर्धेतील १० संघांना २ गटात विभागण्यात आले आहे. २१ फेब्रुवारीपर्यंत गट फेरीतील लढती होतील. या लढती भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.३० आणि रात्री १०.३० वाजता पाहता येतील. दोन्ही ग्रुपमधील टॉपचे २ संघ सेमीफायनलमध्ये जातील. २३ आणि २४ रोजी सेमीफायनलच्या लढती होतील. २६ तारखेला केप टाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर फायनल मॅच होणार आहे.

आगीच्या गोळ्या सारखा होता तो चेंडू; स्टंप फक्त हवेत उडलेला दिसला, अशी निघाली रोहितची विकेट
भारतीय संघ

स्पर्धेत भारतीय संघ ग्रुप २ मध्ये आहे. या ग्रुपमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे दोन वर्ल्डकप विजेते संघ आहेत. सोबत पाकिस्तान आणि आयर्लंड देखील आहे. ग्रुप १ मध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांचा समावेश आहे.

पहिली लढत पाकिस्तानविरुद्ध

उद्या १२ फेब्रुवारी रोजी भारतीय संघासमोर पाकिस्तानचे आव्हान असेल. केप टाउनमध्ये संध्याकाळी ६.३० वाजता ही लढत होणार आहे. भारताची दुसरी लढत वेस्ट इंडिजविरुद्ध १५ फेब्रुवारी रोजी, १८ तारखेला इंग्लंडविरुद्ध तर अखेरची लढत १० तारखेला आयर्लंडविरुद्ध होईल.

Rohit Sharma Hundred: कसोटीत देखील रोहितच हिटमॅन; पहिल्या कसोटीत केलं विक्रमी शतक
टीम इंडियाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे आहे. तिच्या नेतृत्वाखाली भारताने २०२० चा वर्ल्डकप खेळला होता. तेव्हा भारत अंतिम फेरीत पोहोचला होता. पण ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. कौरच्या नेतृत्वाखाली भारताने बर्मिंघम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची अंतिम मॅच खेळली होती. यावेळी भारतीय संघ विजेतेपदाचे दावेदार आहे.

५ जणांवर अन्याय करून एवढी मेहरबानी कशासाठी? उपकर्णधाराचे रेकॉर्ड बघून तुम्हीच ठरवा संघात काय चाललंय
२००९ पासून ही स्पर्धा सुरू होत आहे आणि ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ५ वेळा याचे विजेतेपद मिळवले आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी एकदा चषक उंचावला होता. ऑस्ट्रेलियाने २०१०, २०१२ आणि २०१४ अशी सलग ३ विजेतेपद मिळवली आहेत. भारताला गेल्या वर्षी उपविजेतेपद मिळाले होते. टीम इंडियाने स्पर्धेत ३१ पैकी १७ लढती जिंकल्या आहेत.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज