नवी दिल्ली : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. कारण एकही सामना न खेळता तुम्ही कोणत्याही खेळाडूला संघाबाहेर कसं काढू शकता, असा सवाल चाहत्यांच्या मनात आहे. कारण एकही सामना न खेळता कुलदीप यादवला आता संघाबाहेर काढण्यात आले आहे.
भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी एक बदल केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी कुलदीप यादवची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. पण या सामन्यात कुलदीपला संधी देण्यात आली नाही. पहिल्या कसोटीत भारतीय संघात रवींद्र जडेजा, आर. अश्विन आणि जयंत यादव हे तीन फिरकीपटू होते. पहिल्या सामन्यात जयंतचा चमकदार कामगिरी करता आली नाही, त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात कुलदीपला संधी मिळेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण कुलदीपला संघात स्थान देण्याऐवजी त्याला संघाबाहेर काढण्यात आले आहे. कुलदीपच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे.
नेमकं घडलं तरी काय, पाहा...बीसीसीआयने २२ फेब्रुवारीला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी संघाची निवड केली होती. त्यावेळी अक्षरला दुखापत झाली होती आणि तो फिट असला तरच खेळेल, असेही बीसीसीआयने म्हटले होते. पण पहिल्या कसोटीसाठी अक्षर फिट नसेल, ही बीसीसीआयला समजले. त्यामुळे बीसीसीआयने त्यावेळी अक्षरच्या जागी संघात कुलदीपची निवड केली होती. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी अक्षरची फिटनेस चाचणी घेण्यात आली आणि यामध्ये तो पास झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अक्षरला संघात स्थान देण्यात आले असून त्याच्याजागी संघात आलेल्या कुलदीपला मात्र संघाबाहेर जावे लागले आहे. त्यामुळे आता अक्षर दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी पात्र असेल. पण कुलदीपला मात्र बऱ्याच कालावधीनंतर संधी मिळाली होती आणि एकही सामना न खेळता त्याला आता संघाबाहेर जावे लागणार आहे. आता कुलदीपला पुन्हा भारताच्या कसोटी संघात स्थान मिळणार की नाही, याची चर्चा चाहते करत आहेत.
भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी एक बदल केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी कुलदीप यादवची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. पण या सामन्यात कुलदीपला संधी देण्यात आली नाही. पहिल्या कसोटीत भारतीय संघात रवींद्र जडेजा, आर. अश्विन आणि जयंत यादव हे तीन फिरकीपटू होते. पहिल्या सामन्यात जयंतचा चमकदार कामगिरी करता आली नाही, त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात कुलदीपला संधी मिळेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण कुलदीपला संघात स्थान देण्याऐवजी त्याला संघाबाहेर काढण्यात आले आहे. कुलदीपच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे.
नेमकं घडलं तरी काय, पाहा...बीसीसीआयने २२ फेब्रुवारीला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी संघाची निवड केली होती. त्यावेळी अक्षरला दुखापत झाली होती आणि तो फिट असला तरच खेळेल, असेही बीसीसीआयने म्हटले होते. पण पहिल्या कसोटीसाठी अक्षर फिट नसेल, ही बीसीसीआयला समजले. त्यामुळे बीसीसीआयने त्यावेळी अक्षरच्या जागी संघात कुलदीपची निवड केली होती. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी अक्षरची फिटनेस चाचणी घेण्यात आली आणि यामध्ये तो पास झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अक्षरला संघात स्थान देण्यात आले असून त्याच्याजागी संघात आलेल्या कुलदीपला मात्र संघाबाहेर जावे लागले आहे. त्यामुळे आता अक्षर दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी पात्र असेल. पण कुलदीपला मात्र बऱ्याच कालावधीनंतर संधी मिळाली होती आणि एकही सामना न खेळता त्याला आता संघाबाहेर जावे लागणार आहे. आता कुलदीपला पुन्हा भारताच्या कसोटी संघात स्थान मिळणार की नाही, याची चर्चा चाहते करत आहेत.