अ‍ॅपशहर

विराट कोहलीने दोन व्यक्तींना समर्पित केलं पहिलं शतक, म्हणाला ' मला धक्का बसला अन् वाटलं...'

Virat Kohli: विराट कोहलीला या सामन्यात बा्प्पा पावला. कारण त्याला यावेळी पहिले ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील शतक झळकावता आले. विराट कोहलीचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१वे शतक ठरले. या शतकासह त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगशी यावेळी बरोबरी केली आहे. पण शतकांच्या यादीत प्रथम स्थानावर आहे ते भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 9 Sep 2022, 7:40 am
दुबई : विराटट कोहलीला आतापर्यंच ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आले नव्हते. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातील त्याचे हे पहिले ट्वेन्टी-२० शतक ठरले आहे. आपले हे शतक कोहलीने दोन व्यक्तींना समर्पित केल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर या शतकानंतर कोहलीने आपल्या भावनाही व्यक्त केल्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम team india
सौजन्य-ट्विटर


कोहली म्हणाला की, " "गेल्या अडीच वर्षांनी मला खूप काही शिकवलं. मी एका महिन्यात ३४ वर्षांचा होणार आहे. त्यामुळे यापूर्वी मी ज्यापद्धतीने आक्रमक सेलिब्रेशन करायचो, तसे आता करणार नाही. खरं तर मला धक्का धक्का बसला होता. माल वाटलं की हा शेवटचा प्रकार माझ्यासाठी शिल्लक राहीलेला आहे. पण या काळात मला संघाने चांगली मदत केली. जेव्हा मी शतक झळकावलं तेव्हा मी माझी रिंग पहिल्यांदा किस केली. मी इथे उभा आहे ते फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीमुळे, ती व्यक्ती म्हणजे अनुष्का. प्रत्येकवेळी ती माझ्याबरोबर उभी राहीली. त्यामुळे हे शतक मी तिला समर्पित करतो आणि त्याचबरोबर माझी लहान मुलगी वामिकालाही हे शतक समर्पित करतो. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर कायम असते तेव्हा काही गोष्टी सोप्या होतात. जेव्हा मी संघात परतलो त्यापूर्वी मी सहा आठवड्यांची सुट्टी घेतली होती. या सुट्टीमध्ये मी किती थकलो आहे, हे मला जाणवले. या एका ब्रेकमुळे मला पुन्हा एकदा खेळाचा आनंद लुटता आला."

विराट कोहलीचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१वे शतक ठरले. या शतकासह त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगशी बरोबरी केली आहे. पण शतकांच्या यादीत प्रथम स्थानावर आहे ते भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं झळकावली होती. त्यामुळे आता हा विश्वविक्रम कोहली मोडणार की नाही, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. पण सचिनला ट्वेन्टी-२० किकेटमध्ये शतक झळकावता आले नव्हते. पण कोहलीने आता पहिले शतक झळकावले आहे. त्यामुळे आता कोहली अजून किती शतकं झळकावतो, याची उत्सुकता सर्वांना असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज