ब्रिस्बेन, IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा दिवस चांगलाच रंगतदार ठरला. ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारताने ३०० धावांच्या आतमध्येच रोखले. मोहम्मद सिराजने यावेळी पाच विकेट्स मिळवत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले, तर शार्दुल ठाकूर चार विकेट्स मिळवत त्याला चांगली साथ दिली. त्यामुळे पाचव्या दिवशी आता विजयासाठी भारताला ३२४ धावांची गरज आहे. पहिल्या दिवसअखेर रोहित शर्माच्या चौकाराच्या जोरावर भारताची बिनबाद ४ अशी धावसंख्या आहे. त्यामुळे आता सामन्याच्या पाचव्या दिवशी कोणत्या संघाचा विजयी झेंडा फडकणार, याची उत्सुकता सर्वच क्रिकेट चाहत्यांना असेल.
ऑस्ट्रेलियाने आज बिनबाद २१ या धावसंख्येवरून आजच्या दिवसाची सुरुवात केली. काही काळ ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी चांगली फलंदाजी केली. पण त्यानंतर भारताच्या गोलंदाजांचे वर्चस्व यावेळी पाहायला मिळाले. भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने यावेळी मार्कस हॅरीसला (३८) बाद करत भारताला पहिले यश २५ व्या षटकात मिळवून दिले. त्यानंतरच्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरचा काटा काढला आणि ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. त्यानंतर काही वेळातच भारताने मार्नस लाबुशेन आणि मॅथ्यू वेड यांनाही बाद केले आणि ऑस्ट्रेलियाची बिनबाद ८९ वरून ४ बाद १२३ अशी अवस्था झाली.
यावेळी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. स्मिथने यावेळी ५५ धावांची खेळी साकारल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. स्मिथला यावेळी तळाच्या फलंदाजांकडूनही चांगली साथ मिळाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात २९४ धावांपर्यंत मजल मारता आली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३६ धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे भारताला विजयासाठी ३२८ धावांचे लक्ष्य मिळाले. आजच्या दिवशी भारतीय संघाला १.५ षटके गोलंदाजी करता आली आणि त्यांनी कोणतीही विकेट न गमावता यावेळी ४ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी अजून ३२४ धावांची गरज आहे.
भारताकडून यावेळी मोहम्मद सिराजने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ गारद केला. यावेळी सिराजला शार्दुलने चांगली साथ दिली आणि चार विकेट्स पटकावल्या. त्याचबरोबर सुंदरने यावेळी एक बळी मिळवला. आता भारताचे फलंदाज पाचव्या दिवशी कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
ऑस्ट्रेलियाने आज बिनबाद २१ या धावसंख्येवरून आजच्या दिवसाची सुरुवात केली. काही काळ ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी चांगली फलंदाजी केली. पण त्यानंतर भारताच्या गोलंदाजांचे वर्चस्व यावेळी पाहायला मिळाले. भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने यावेळी मार्कस हॅरीसला (३८) बाद करत भारताला पहिले यश २५ व्या षटकात मिळवून दिले. त्यानंतरच्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरचा काटा काढला आणि ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. त्यानंतर काही वेळातच भारताने मार्नस लाबुशेन आणि मॅथ्यू वेड यांनाही बाद केले आणि ऑस्ट्रेलियाची बिनबाद ८९ वरून ४ बाद १२३ अशी अवस्था झाली.
यावेळी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. स्मिथने यावेळी ५५ धावांची खेळी साकारल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. स्मिथला यावेळी तळाच्या फलंदाजांकडूनही चांगली साथ मिळाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात २९४ धावांपर्यंत मजल मारता आली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३६ धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे भारताला विजयासाठी ३२८ धावांचे लक्ष्य मिळाले. आजच्या दिवशी भारतीय संघाला १.५ षटके गोलंदाजी करता आली आणि त्यांनी कोणतीही विकेट न गमावता यावेळी ४ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी अजून ३२४ धावांची गरज आहे.
भारताकडून यावेळी मोहम्मद सिराजने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ गारद केला. यावेळी सिराजला शार्दुलने चांगली साथ दिली आणि चार विकेट्स पटकावल्या. त्याचबरोबर सुंदरने यावेळी एक बळी मिळवला. आता भारताचे फलंदाज पाचव्या दिवशी कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.