ब्रिस्बेन, IND vs AUS : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचला. भारतीय संघाने बोर्डर-गावस्कर ट्राॉफीमध्ये विजयाची हॅट्रीक नोंदवली, त्याचबरोबर ब्रिस्बेनच्या मैदानात भारतीय संघाना बऱ्याच वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची किमया करून दाखवली. त्यामुळे भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय संघाचे कौतुक करण्याती बीसीसीआयही मागे राहिलेली नाही. बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना भरगच्च बोनस यावेळी जाहीर केला आहे.
ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाला यावेळी पाच कोटी रुपयांचा बोनस बीसीसीआयने जाहीर केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबतची माहिती दिली असून बीसीसीआयने याबाबतचे ट्विटही केले आहे. भारताने ब्रिस्बेनमधील सामना जिंकत मालिका २-१ या फरकाने जिंकली आहे. त्याचबरोबर ब्रिस्बेनमध्ये भारताचा विजय ऐतिहासिक ठरला आहे. कारण आतापर्यंत ऑस्ट्रेलियाला हे मैदान लकी ठरत होते. पण भारतीय संघांनी ऑस्ट्रेलियाचा याच मैदानात पराभव करून मालिका जिंकलेली आहे.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात धमाकेदार विजय मिळवला. रिषभ पंतने चौकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पण या विजयासह भारतीय संघाने एक हॅट्रिकही साधली आहे. यापूर्वी बोर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियामध्ये २०१८-१९ साली खेळवण्यात आली होती. ही चार कसोटी सामन्यांची मालिका होती. या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला होता. त्यापूर्वी म्हणजेच २०१६-१७ साली भारतामध्ये बोर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात आली होती. यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २-१ असा विजय मिळवला होता. त्यामुळे भारतासाठी ही बोर्डर-गावस्कर ट्रॉफीची हॅट्रीक ठरली आहे.
भारताने २०१६-१७ साली बोर्डर-गावस्कर ट्रॉफी पहिल्यांदा जिंकली होती. त्यानंतर भारतामध्ये २०१८-१९ साली भारतामध्ये बोर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात आली होती आणि ती भारताने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलग तीन मालिका भारताला यापर्वी कधीच जिंकता आल्या नव्हत्या.
ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाला यावेळी पाच कोटी रुपयांचा बोनस बीसीसीआयने जाहीर केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबतची माहिती दिली असून बीसीसीआयने याबाबतचे ट्विटही केले आहे. भारताने ब्रिस्बेनमधील सामना जिंकत मालिका २-१ या फरकाने जिंकली आहे. त्याचबरोबर ब्रिस्बेनमध्ये भारताचा विजय ऐतिहासिक ठरला आहे. कारण आतापर्यंत ऑस्ट्रेलियाला हे मैदान लकी ठरत होते. पण भारतीय संघांनी ऑस्ट्रेलियाचा याच मैदानात पराभव करून मालिका जिंकलेली आहे.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात धमाकेदार विजय मिळवला. रिषभ पंतने चौकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पण या विजयासह भारतीय संघाने एक हॅट्रिकही साधली आहे. यापूर्वी बोर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियामध्ये २०१८-१९ साली खेळवण्यात आली होती. ही चार कसोटी सामन्यांची मालिका होती. या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला होता. त्यापूर्वी म्हणजेच २०१६-१७ साली भारतामध्ये बोर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात आली होती. यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २-१ असा विजय मिळवला होता. त्यामुळे भारतासाठी ही बोर्डर-गावस्कर ट्रॉफीची हॅट्रीक ठरली आहे.
भारताने २०१६-१७ साली बोर्डर-गावस्कर ट्रॉफी पहिल्यांदा जिंकली होती. त्यानंतर भारतामध्ये २०१८-१९ साली भारतामध्ये बोर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात आली होती आणि ती भारताने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलग तीन मालिका भारताला यापर्वी कधीच जिंकता आल्या नव्हत्या.