अ‍ॅपशहर

IND vs AUS : एकही नो बॉल नाही, पण एकाच षटकात टाकले गेले चक्क १२ चेंडू, पाहा नेमकं घडलं तरी काय...

नाणेफेक हरल्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली आणि तगड्या ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी २७८ धावांचे आव्हान उभारले. भारताकडून कर्णधार मिताली राज, यस्तिका भाटिया आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांनी अर्धशतके झळकावली. ऑकलंडच्या ईडन पार्कवर झालेल्या सामन्यात हे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या १२ चेंडूंच्या षटकात एकही नो बॉल नसल्याचेच यावेळी पाहायला मिळाले.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 19 Mar 2022, 8:25 pm
ICC Womens World Cup 2022 : ईडन पार्क, ऑकलंड : क्रिकेटमध्ये एक षटक हे ६ चेंडूंचे असते, पण भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या महिला गोलंदाजाने एक षटकात १२ चेंडू टाकले होते. हे कसं काय झालं, असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. तर हे पंचाच्या चुकीमुळे नाही, तर गोलंदाजाच्या चुकीमुळे झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind vs aus ellyse perry bowled 12 balls over against india in icc womens world cup 2022
IND vs AUS : एकही नो बॉल नाही, पण एकाच षटकात टाकले गेले चक्क १२ चेंडू, पाहा नेमकं घडलं तरी काय...

असे होते १२ चेंडूंचे षटक
ऑस्ट्रेलियाचे हे मोठे षटक भारतीय डावातील १२ वे षटक होते. हे षटक स्टार गोलंदाज एलिस पेरीने टाकले. पेरी सामन्यातील तिचे पहिले षटक करत होती. पहिल्या चेंडूवर एकही धाव न देता तिने आपल्या षटकाची सुरुवात केली. यानंतर तिने दुसरा चेंडू वाइड टाकला त्यावर चौकार गेला. त्यानंतर तिसरा चेंडू पुन्हा वाइड टाकला आणि एक धाव दिली. चौथा चेंडूही वाइड. यानंतर पाचव्या चेंडूवर एक धाव दिली. तर सहावा आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तिने सलग तीन वाइड फेकले. एक चेंडू पूर्ण करण्यासाठी महिला गोलंदाजाला ४ वेळा चेंडू टाकावा लागला. ऑकलंडच्या ईडन पार्कवर झालेल्या सामन्यात हे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या १२ चेंडूंच्या षटकात एकही नो बॉल नव्हता. फक्त ६ चेंडू वाइड टाकले होते. यापैकी चार वाइड हे शेवटचा चेंडू पूर्ण करण्यासाठी टाकले गेले.
१२ चेंडूत १६ धावा
एलिस पेरीच्या या एका षटकातून भारताने २ चौकारांसह एकूण १६ धावा जमवल्या. पेरीने सामन्यातील १२ वे षटक १२ चेंडूचे टाकले. सामन्यात ३३ व्या षटकात मिताली आणि यस्तिकाची जोडी फुटल्यानंतर तिच्याकडे पुन्हा गोलंदाजीसाठी चेंडू देण्यात आला. भारताविरुद्धच्या पहिल्या षटकात १२ चेंडू टाकणाऱ्या एलिस पेरीने याआधी स्पर्धेतील ७५ टक्के चेंडू डॉट केले होते. ऑस्ट्रेलियाने एकूण २९ अवांतर धावांची खैरात केली. यामुळे भारताला २७७ धावांपर्यंत पोहोचवण्यात कांगारुंच्या गोलंदाजांचाही काहीसा वाटा होता. कारण त्यांच्याकडून ज्या चुका झाल्या त्यामुळेच भारताला मोठी धावसंख्या उभारता आली.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख