अ‍ॅपशहर

IND vs AUS : मॅच संपल्यावर मला भेट... अर्धशतकवीर शुभमन गिल ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूवर चांगलाच भडकला

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय सलामीवीरांनी यावेळी संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू शुभमन गिलबरोबर स्लेजिंग करत होता. यावेळी गिलने चांगलाच भडकला आणि त्याने सामना संपल्यावर भेट, असे थेट उत्तर दिले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jan 2021, 1:43 pm
सिडनी, IND vs AUS : भारताचा अर्धशतकवीर सलामीवीर शुभमन गिल यावेळी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूवर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. गिलचा पारा एवढा चढला होता की, मॅच संपल्यावर तु मला भेट, असे म्हणायलाही गिल कचरला नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम शुभमन गिल


नेमकं घडलं तरी काय...
गिल आणि रोहित शर्मा यांनी भारताच्या डावाची चांगली सुरुवात केली होती. हे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना पाहवत नव्हते आणि त्यामुळेच त्यांनी स्लेजिंग करायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मार्नल लाबुशेनने यावेळी रोहित शर्माबरोबरही स्लेजिंग केली. लाबुशेनने रोहितला विचारले की, तुझा क्वारंटाइनचा कखडतर काळ नेमका कसा होता? या प्रश्नावर रोहितने लाबुशेनला कोणतेच उत्तर दिले नाही. रोहितने यावेळी आपल्या बॅटनेच ऑस्ट्रेलियाच्या संघाला उत्तर देत होता.


लाबुशेनने यावेळी गिलबरोबरही स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला. लाबुशेन गिलला म्हणाला की, " तुझा आवडता खेळाडू कोण आहे, सचिन तेंडुलकर की विराट कोहली?" पहिल्यांदा या प्रश्नावर गिलने लाबुशेनला कोणतेच उत्तर दिले नाही. पण लाबुशेन सातत्याने गिलला त्रास देत होता. त्यानंतर लाबुशेनने गिलला पुन्हा एकदा विचारले की, " तुझा आवडता खेळाडू सचिन आहे की विराट, तुमच्या संघाला यावेळी विराटची सर्वात जास्त आठवण येत असेल ना?" यानंतर मात्र गिलने आपले मौन सोडले. गिल लाबुशेनला म्हणाला की, " सामना संपल्यावर मला भेट, तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देतो."


भारताच्या डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागिदारी केली. ही जोडी टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभी करून देईल असे वाटत असताना जोश हेजलवुडने रोहितला २७ धावांवर बाद केले. त्यानंतर गिलने कसोटी करिअरमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर तो लगेच बाद झाला. दोन्ही सलामीवीर कमी अंतराने बाद झाल्याने भारताची अवस्था २ बाद ८५ अशी झाली. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजार यांनी विकेट पडू दिली नाही.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताने २ बाद ९६ धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा मैदानात आहेत. भारत अद्याप २४२ धावांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steven Smith)चे शानदार शतक आणि भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) गोलंदाजी ही दुसऱ्या दिवसाच्या डावाचे मुख्य वैशिष्ट ठरले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज