अ‍ॅपशहर

IND vs AUS : दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी...

ind vs aus 2nd t 20 : भारतासाठी हा दुसरा सामना महत्वाचा आहे. कारण हा भारतासाठी करो या मरो, असा सामना असेल, कारण यावेळी भारत पराभूत झाला तर त्यांचे मालिकेतील आव्हान संपणार आहे आणि ऑस्ट्रेलिया मालिका जिंकू शकते. त्यामुळे या मोठ्या सामन्यासाठी भारतीय संघात नेमकी कोणाका संधी मिळाली आहे, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 23 Sep 2022, 9:19 pm
नागपूर : दुसऱ्या सामन्याचा टॉस भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला. रोहितने यावेळी टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याची निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघआत दोन मोठे बदल करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind vs aus
सौजन्य-ट्विटर


दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन मोठे बदल झाले आहेत. या सामन्यासाठी उमेश यादवला विश्रांती दिली आहे आणि त्याच्या जागी जसप्रीत बुमरा संघात आला आहे. त्याचबरोबर यावेळी रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले आहे.

यावेळी आठ षटकांचा हा सामना होणार आहे. प्रत्येक खेळाडूला जास्तीत जास्त दोन षटकं टाकता येतील आणि पॉवर प्ले हा दोन षटकांचा असेल.

या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होऊ शकतात. कारण भारतासाठी हा सामना करो या मरो, असा असणार आहे. कारण हा सामना गमावल्यावर भारताचे या मालिकेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे भारतासाठी हा सामना महत्वाचा आहे. त्यामुळेच या सामन्यासाठी संघ कसा निवडला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

दुसऱ्या ट्वेन्टी सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल होऊ शकतात, असे म्हटले जात होते. यापूर्वी नागपूरमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सामना झाला होता. या सामन्यात चहरने ३.२ षटकांत फक्त सात धावा दिल्या होत्या आणि तब्बल सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. चहरच्या या कामगगिरीच्या जोरावर भारताने हा सामना ३० धावांनी जिंकला होता. त्यामुळे या सामन्यासाठी जर चहरला संधी दिली तर त्याचे मनोबल वाढू शकते आणि त्याचा फायदा भारताला होऊ शकतो. त्यामुळे चहरला या सामन्यात संधी मिळू शकते. पण चहरला संघात संधी द्यायची असेल तर हर्षल पटेल किंवा उमेश यादव यांच्यापैकी एकाला संघाबाहेर जावे लागू शकते, असे म्हटले जात होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात युजवेंद्र चहल हा चांगलाच महागडा ठरला होता. कारण त्याने गेल्या सामन्यात ३.२ षटकांमध्ये ४२ धावा दिल्या होत्या. त्यामुळे आता या सामन्यासाठी चहलला संघाबाहेर केले जाऊ शकते, असे म्हटले जात होते. पण त्याच्या जागी कोणाला संधी द्यायची, हा मोठा निर्णय भारतीय संघाला घ्यावा लागणार होता. त्यचाबरोबर या सामन्यात भुवनेश्वर कुमारला संघाबाहेर केले जाऊ शकते, असे
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज