अ‍ॅपशहर

IND vs AUS : तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी...

IND vs AUS 3rd T 20 : तिसऱ्या आणि निर्णायक ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारताचा कर्णधार रोहित शर्माने आपला संघ जाहीर केला. दोन्ही संघांसाठी हा मोठा सामना आहे, कारण जो संघ हा सामने हरेल त्यांना मालिका गमवावी लागणार आहे. त्यामुळे या लढतीसाठी भारतीय संघात मोठे बदल झाले आहेत. या सामन्यासाठी कोणाला संधी मिळाली, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 25 Sep 2022, 6:44 pm
हैदराबाद : तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यामध्ये रोहित शर्माने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यावर रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आपला या सामन्यासाठीचा संघ जाहीर केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind vs aus
सौजन्य-ट्विटर


या तिसऱ्या सामन्यासाठी रोहित शर्माने भारतीय संघात एक मोठा बदल केला. या सामन्यासाठी रोहितने संघातून रिषभ पंतला बाहेर काढले. रिषभ पंतला संघाबाहेर करत रोहितने यावेळी भुवनेश्वर कुमारला संघात स्थान दिले आहे, हा एकमेव बदल आजच्या सामन्यासाठी करण्यात आला आहे.

भारताने दुसरा ट्वेन्टी-२० सामना जिंकला खरा, पण त्यामध्ये हर्षल पटेल आणि युजवेंद्र चहल यांना चांगली गोलंदाजी करता आली नाही. या दोघांनीही भरपूर धावा दिल्या. त्याचबरोबर सातत्याने हे दोघे अचूक आणि भेदक मारा करण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे तिसऱ्या आणि सर्वात महत्वाच्या या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल होऊ शकतात, असे म्हटले जात होते. हर्षलच्या जागी दीपक चहर हा संघात येऊ शकतो, त्यामुळे भारताची वेगवान गोलंदाजी अधिक बळकट होऊ शकेल. त्याचबरोबर दीपक हा उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे दीपक हा भारतासाठी महत्वाचा असेल.

चहल गेल्या काही सामन्यांमध्ये जास्त धावा देत आहे, त्याचबरोबर त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी पाहायला मिळत नाही. एकिकडे अक्षर पटेल हा भन्नाट गोलंदाजी करत त्याला चहलकडून चांगली साथ मिळालेली नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात चहलला वगळण्यात येईल, असे म्हटले जात होते. चहलच्या जागी भारतीय संघात आर. अश्विनचा समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात हे दोन मोठे बदल होऊ शकतात, असे दिसत आहे.

या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. पहिल्या सामन्यात भारताने २०८ धावा केल्या होत्या. पण तरीही त्यांना पराबव पत्करावा लागला होता. या सामन्यात पुन्हा एकदा भुवी अपयशी ठरला होता. १९व्या षटकात त्याने जास्त धावा दिल्या आणि भारताच्या हातून सामना निसटला होता. दुसरा सामना हा नागपूरमध्ये झाला. या सामन्यात पावसामुळे ८ षटकांचा सामना खेळवण्यता आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ९० धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने नाबाद ४६ धावांची तुफानी खेळी साकारली होती. त्यानंतर अखेरच्या षटकात ९ धावा हव्या असताना दिनेश कार्तिकने दोन चेंडूंमध्येच हा सामना संपववला होता. या विजयासह भारताने या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.

भारताचा संघ कसा असेल पाहा : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन/चहल, अक्षर पटेल, दीपक चहर/हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज